-
मुंबई प्रतिनिधी
“आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात मुंबईसाठी काय कामं केली, याचा हिशोब कधीही द्यायला तयार आहोत… पण तुम्ही मुंबईसाठी नेमकं काय केलं?” असा थेट सवाल मुंबई भाजपा अध्यक्ष आणि राज्याचे मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आज ठाकरे बंधूंना केला.
दादरच्या योगी सभागृहात पार पडलेल्या भाजपाच्या मुंबई विभागीय कार्यशाळेत मंत्री शेलार यांनी पक्षाच्या आगामी रणनीतीबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना विरोधकांवर जोरदार टीका केली.
(हेही वाचा – Vat Purnima 2025 : वटपौर्णिमा व्रताचे महत्त्व आणि व्रत करण्याची पद्धत)
मोदी सरकारच्या ११ वर्षांचा विकास हिशेबासहित
“गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे अटलजींनंतर पहिले पंतप्रधान. गेल्या ११ वर्षांत मोदी सरकारने मुंबईला काय दिलं? – ९ मेट्रो प्रकल्प, कोस्टल रोड, बुलेट ट्रेन, नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ, धारावी पुनर्विकास प्रकल्प – ही सर्व कामं आज उभी राहिली आहेत,” असे सांगून शेलार यांनी भाजपाच्या विकासकामांचा यादीसह हिशेब मांडला.
धारावीला मिळणार ‘झोपडपट्टी’चा शिक्का नाही – विकासाचं नवं पर्व!
शेलार यांनी स्पष्ट केलं की, “धारावीला काँग्रेस-शिवसेनेनं झोपडपट्टीचा शिक्का मारला. पण भाजपा सरकारने तो पुसून टाकत आशियातील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प उभा केला आहे.”
(हेही वाचा – Mumbai Train Accident : गेल्या २० वर्षात रेल्वे अपघातात ५१ हजार ८०२ जणांनी प्राण गमावले)
विरोधकांना सडेतोड आव्हान
“आमच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांनी आधी स्वतःचा चेहरा आरशात पाहावा. शहरातील प्रत्येक मोठ्या विकासकामाला विरोध करणाऱ्यांनी आता मुंबईच्या हितासाठी तरी भूमिका बदलावी. आम्ही कधीही चर्चेसाठी तयार आहोत,” असा ठणकाव शेलार यांनी विरोधकांना दिला.
प्रमुख नेत्यांची उपस्थिती आणि संघटनात्मक ताकद
या कार्यशाळेला महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, आमदार विक्रांत पाटील, संजय उपाध्याय, अमित साटम, प्रविण दरेकर, माजी खासदार गोपाळ शेट्टी आदी नेत्यांसह मुंबईतील सर्व नवनियुक्त जिल्हाध्यक्ष, मंडल अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
‘मुंबईसाठी काम करणारे’ विरुद्ध ‘फक्त नावाच्या मुंबईकर’
शेवटी मंत्री शेलार यांनी विरोधकांवर निशाणा साधत म्हटलं, “मुंबईच्या विकासात खारीचा वाटा उचलणाऱ्यांवर प्रश्न उभा करणाऱ्यांनी आधी स्वतः मुंबईसाठी काय केलं ते सांगा. आम्ही काम केलेलं दाखवू शकतो – तुम्ही केवळ वल्गना!”
या कार्यशाळेच्या माध्यमातून भाजपाने पुन्हा एकदा मुंबईत आपल्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा ओतली असून, आगामी निवडणुकांसाठी संघटनात्मक तयारीचा बिगुल फुंकला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community