
-
प्रतिनिधी
“हिंदुत्वाचं प्रतीक असलेला सार्वजनिक गणेशोत्सव कुणाच्याही दबावामुळे बंद होणार नाही,” असा रोखठोक इशारा सांस्कृतिक कार्यमंत्री आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सोमवारी परेलमधील शिरोडकर सभागृहात आयोजित गणेश मंडळांच्या भव्य मेळाव्यात दिला.
“काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना उबाठाच्या आडून चालणाऱ्या शहरी नक्षलवाद्यांच्या अजेंड्याला यश मिळू देणार नाही. ही लढाई अर्धवट थांबलेली नाही – सरकार ३० जूनपर्यंत मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबतची भूमिका न्यायालयात मांडेल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
“हे सण बंद करण्याचे कटकारस्थान आहे”
शेलार (Ashish Shelar) म्हणाले, “२००३ मध्ये नैसर्गिक जलस्त्रोतांवर हिंदूंच्या धार्मिक विधी बंद करण्यासाठी याचिका दाखल झाली आणि त्यात पीओपी मूर्तींचाही विषय घुसवण्यात आला. तेव्हाच जर सरकारने योग्य भूमिका घेतली असती, तर आज इतका संघर्ष करण्याची वेळ आली नसती. काँग्रेस आघाडी सरकार, आदित्य ठाकरे आणि शिवसेना उबाठाने सणविरोधी पवित्रा घेतला.”
(हेही वाचा – Meta AI Video Editing : फेसुबकवर आता एआयच्या मदतीने व्हिडिओही होणार एडिट)
“हिंदुत्वाचं बेगडी मुखवटा फाटलंय!”
“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना गणेशोत्सवाच्या बाजूने उभं राहण्याऐवजी त्यांनी विरोधात भूमिका घेतली. मुंबई महापालिकेच्या २०१८ च्या अर्थसंकल्पात पीओपीवर बंदी घालण्याचा प्रस्ताव त्यांच्याच आदेशाने आला होता. हे बेगडी हिंदुत्व आता उघडं पडलंय,” असा थेट आरोप शेलार (Ashish Shelar) यांनी केला.
२५,००० कोटींच्या उद्योगावर गदा – मूर्तिकार देशोधडीला
“मूर्तिकार, पूजासामग्री, मंडप व्यवसाय मिळून तब्बल २५,००० कोटींचा गणेशोत्सव उद्योग आहे. पीओपीवर बंदी घालून याचे पूर्णपणे खच्चीकरण करण्याचा डाव या पक्षांनी आखला होता. पण आता बंदी उठल्याने सत्य जनतेसमोर आलं आहे,” अशी टीका त्यांनी केली.
(हेही वाचा – India Domestic Calendar : २०२५-२६ चा भारतातील क्रिकेट सामन्यांचा कार्यक्रम जाहीर; भारतात कोणते संघ येणार?)
आम्ही गणेशभक्त म्हणून लढतोय; चर्चेसाठीही तयार आहोत!
“आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी यायला हवं, आम्ही चर्चेसाठी ‘मातोश्री’वरही जायला तयार आहोत. पण प्रश्नांची उत्तरं द्या – त्यावेळी उत्सवांच्या बाजूने का उभं राहिला नाहीत?” असा रोखठोक सवालही शेलार (Ashish Shelar) यांनी विरोधकांना केला.
३० जूनपूर्वी मोठ्या मूर्तींच्या विसर्जनावर भूमिका स्पष्ट
“सरकार कायद्याच्या चौकटीत राहूनच मोठ्या गणेश मूर्ती विसर्जनावर आपली भूमिका ३० तारखेपूर्वी न्यायालयात मांडेल,” अशी स्पष्ट घोषणा त्यांनी केली.
“गणेशोत्सव ही श्रद्धेची परंपरा आहे, ती राजकीय डावपेचांच्या बलिदानासाठी नाही. हे सण हद्दपार करण्याचे षडयंत्र भाजपाला मान्य नाही – आणि हे थांबवण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढू,” अशा निर्धाराने शेलारांनी (Ashish Shelar) मेळाव्याच्या अखेरीस घोषणा दिल्या.
सार्वजनिक गणेशोत्सवावर सावट आलं तरी, ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष थांबणार नाही – असा संदेश आजच्या मेळाव्यातून ठळकपणे गेला!
हेही पहा –
Join Our WhatsApp Community