कालीचरण महाराजांच्या समर्थनात वारकरी परिषद! काय आहे भूमिका? वाचा…

76

गेल्या काही दिवसांपूर्वी अकोल्यातल्या पुरातन शिवमंदीरात एका कालीचरण नावाच्या महाराजानं शिवतांडव स्तोत्र म्हटलं आणि ते जगप्रसिद्ध झाले. ‘शिवतांडव स्तोत्र’ म्हणणाऱ्या या महाराजाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. या तरुण महाराजाचा आवाज, त्याची स्टाईल पाहून त्याच्या नावाची चांगलीच चर्चा झाली. मात्र आता हे महाराज एखाद्या स्तोत्रामुळे नाही, तर शिवीगाळ केल्याने चर्चेत आले आहे. ही शिवीगाळ त्यांनी कोणा एका भक्ताला किंवा सहकाऱ्याला केली नाही राष्ट्रपिता म्हटल्या जाणाऱ्या महात्मा गांधी यांना केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठवली जात आहे. असे असताना मात्र कालीचरण महाराजांच्या समर्थनात राष्ट्रीय वारकरी परिषद असल्याचे दिसतेय. श्रद्धेय कालीचरण महाराज यांच्यावर टीका करणाऱ्यांनी ते हिंदूंचे धर्मगुरू आहेत हे विसरू नये, असे विधान ह.भ.प अरुण महाराज पिंपळे यांनी केले आहे.

छत्तीसगड राज्यातील धर्मसंसदेचा व्हिडिओ प्रसारित करून कालीपूत्र कालीचरण महाराज यांच्यावर महाराष्ट्रातील विधान सभेत आमदार मंत्री त्यांच्यावर एकेरी भाषा वापरून टीका करीत आहे. वास्तविक व्हिडिओ प्रकरणी त्या राज्यात पोलिसात तक्रार सुद्धा झालेली आहे. कोरोनाच्या काळात कमी वेळेचे अधिवेशन असताना अनेक विषय महत्वाचे असताना मुद्धाम हेतुपुरस्कर अन्य राज्यातील प्रकरण काढून हिंदू साधूंचा अपमान करण्याची तत्परता दाखविली जात असल्याचे वारकरी परिषदेचं म्हणणं आहे.

वारकरी परिषदेची काय आहे भूमिका?

गांधींचा अपमान झाला म्हणून सगळीकडे चर्चा चालू आहे. मात्र ज्या वेळेस हिंदूंचे देव संत व्रत ग्रंथ हिंदू धर्म छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान दररोज करण्यात येतो. त्या वेळेस सर्व आमदार मंत्री एक शब्द सुद्धा काढीत नाहीत. मुघलशाही आदिलशाही यांच्या गुलामीत शेकडो वर्ष हिंदूस्थान होता. मंदिरे तोडले जात होते. सम्राट पृथ्वीराज चौहान महाराणा प्रतापसिंह महाराज गुरु गोविंद सिंह महाराज यांच्या सारख्या अनेक शूर वीरांनी बलिदान दिले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करून मराठ्यांनी तंजावर ते पेशावर भगव्या ध्वजाचे राज्य निर्माण केले. तानाजी मालुसरे, वीर शिवा काशीद, मल्हाराव होळकर, बाजीराव पेशवे, महादजी शिंदे, छत्रसाल बुंदेला यांनी हा हिंदूस्थान उभा केला. इंग्रजांनी कपटीने हे राज्य घंडीत करून दीडशे वर्ष राज्य केले पुन्हा स्वातंत्र्यासाठी हजारो क्रांतिकारकांनी बलिदान दिले जेव्हा इंग्रज गेले तेव्हा देश गांधी व त्यांच्या अनुयायी मंडळींकडे सोपविला. अखंड भारताचे तुकडे गांधींमुळे झाले. पाकिस्तान बांग्लादेशात हिंदूंच्या कत्तली झाल्या आजही चालू आहे. धर्माच्या आधारावर पाकिस्तान निर्माण झाला. राहिलेला हिंदूस्थान हा छत्रपती शिवरायांचा हिंदूंचा असायला हवा होता. मात्र तो निधर्मी बनविण्यात आला त्यामुळे आपल्याच देशात काश्मीरसह अन्य राज्यातील हिंदू पलायन करून निर्वासित होत आहे. भारत तेरे तुकडे होंगे या घोषणा केवळ गांधीवादा मुळेच सुरु आहे.

(हेही वाचा – ‘मोहनदास करमचंद गांधीनं सत्यानाश केला’, कालीचरण महाराज वादाच्या भोवऱ्यात)

जगातील हिंदूंचा निर्वंश होऊ नये व देशातील हिंदू समाज गुलाम होऊ नये यासाठी कालीपूत्र कालीचरण महाराज प्रचार प्रसार करीत आहे. त्यांचे कार्य बंद पाडण्यासाठी व त्यांना बदनाम करण्यासाठी सुनियोजित प्रयत्न चालू आहे. पालघर येथे साधूंची हत्या झाली त्रिपुरामध्ये इस्लामचा अपमान झाला म्हणून अमरावती नांदेड मालेगावमध्ये दंगली घडविण्यात आल्या या विषयी आमदार मंत्री का बोलत नाही ? हा प्रश्न आता जनतेने विचारला पाहिजे व झाकीर नाईक सारख्या फरार आरोपीला सन्मानाची भाषा वापरल्या जाते. मात्र मुद्धाम कालीपूत्र कालीचरण महाराज यांचा नेते मंडळी अवमान करीत आहे. महाराजांच्या वक्तव्याच्या नावाखाली हिंदूंच्या धर्मगुरूंचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही, अशी भूमिका सध्या वारकरी परिषदेची असल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.