Vishalgad अतिक्रमण मुक्त होणार; न्यायालयाच्या आदेशानंतर अतिक्रमण हटवण्याचे काम पुन्हा सुरु

गेल्या वर्षी 14 जुलै रोजी विशाळगड मुक्ती आंदोलन झाले होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यातून विशाळगडाशेजारी (Vishalgad) दंगल झाली. अतिक्रमण केलेल्या मुसलमान आणि आंदोलकांमध्ये वाद झाला होता. 

442
अतिक्रमण मुक्त विशाळगडाच्या (Vishalgad) मोहिमेला गेल्या वर्षी हिंसक वळण लागल्यानंतर आता विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आली आहे. न्यायालयाने दिलेल्या सूचनांचे पालन करत अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे विशाळगड हा अतिक्रमणमुक्त होणार आहे. विशाळगडावरील अतिक्रमणाचा वाद बराच जूना आहे. गेल्या वर्षी विशाळगडाच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेत हिंसाचार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 जुलैपासून अतिक्रमण काढण्यास प्रशासनाने सुरुवात केली. चार दिवस ही कारवाई सुरू होती. या कारवाईत (Vishalgad) गडावरील 94 अतिक्रमणे प्रशासनाने, तर नागरिकांनी स्वतःहून 10 अतिक्रमणे हटवली. मात्र काही जणांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर न्यायालयाने पावसाळा संपेपर्यंत निवासी अतिक्रमणे काढू नका, त्यानंतर कारवाई करा, असे आदेश दिले होते.

14 जुलै 2025 ला विशाळगड मुक्ती आंदोलन झाले होते 

ऐतिहासिक विशाळगड (Vishalgad) हा गड गेल्या काही महिन्यांपासून अतिक्रमणाच्या भोवऱ्यात अडकला असून, अखेर न्यायालयाच्या सूचनांनुसार प्रशासनाने पुन्हा एकदा अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू केली आहे. गडावरील पुरातन वारसा जपण्यासाठी आणि कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. गेल्या वर्षी 14 जुलै रोजी विशाळगड मुक्ती आंदोलन झाले. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यातून विशाळगडाशेजारी (Vishalgad) दंगल झाली. अतिक्रमण केलेल्या मुसलमान आणि आंदोलकांमध्ये वाद झाला होता. जिल्हा प्रशासनाने संपूर्ण गडासह परिसरात संचारबंदी लागू केली होती. विशाळगड अतिक्रमणाबाबत न्यायालयाने पुरातत्त्व विभागाची सुनावणी घेऊन अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्याचे आदेश देण्याचे निर्देशित केले होते. विशाळगडावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार गेल्या वर्षभरात वारंवार पुढे आली होती. या भागात असणारा दर्गा जुना असल्याने ते अतिक्रमण नाही, असे मुस्लीम संघटनांचे म्हणणे होते. अतिक्रमणासंबंधात गेल्या वर्षी 14 जुलैला ‘चलो विशाळगड’ अशी हाक शिवप्रेमींंना आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना दिली होती. त्यानंतर विशाळगडाच्या (Vishalgad) अतिक्रमण विरोधी मोहिमेला हिंसक वळण लागले होते.  दुसर्‍याच दिवसापासून  विशाळगड आणि पायथ्याशी जी 158 अतिक्रमणे आहेत. ती काढण्यासाठी राज्य शासनाने निधीही वर्ग केला हेाता. पण काही बेकायदेशीर बांधकामे अद्यापही हटवलेली नव्हती. आजही या भागात अनेकांची दुकाने, घरं आणि छोटे व्यवसाय उभारले आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.