राज्यात ई-पास रद्द, राज्य सरकारची नवीन नियमावली जाहीर

105

केंद्र सरकारने दिलेल्या सुचनेनुसार आज राज्य सरकारने अनलॉक ४ ची नियमावली जाहीर केली असून, आता राज्य सरकारने ई-पासची अट रद्द केली आहे. या निर्णयामुळे आता मार्च महिन्यापासून सुरु असलेली जिल्हा बंदी अखेर उठली आहे. त्यामुळे राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी परवानगी लागणार नाही. राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन अंतर्गत लॉकडाऊनमध्ये अनेक सवलती दिल्या आहेत.

हॉटेल-लॉजला परवानगी

राज्य सरकारने जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार राज्यात हॉटेल आणि लॉज सुरू करण्याला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. तसेच मुंबईत विमानांची उड्डाणे आणि लँडिंगची संख्या १ सप्टेंबरपासून दुप्पट करण्यात येणार आहे. आतापर्यंत एकूण १०० विमानांचे उड्डाण आणि लँडिंग होते, आता ही संख्या दुप्पट होणार आहे.  मुंबई आणि एमएमआरमध्ये शासकीय कार्यालये ३० टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत, तर उर्वरित महाराष्ट्रात शासकीय कार्यालयात ५० टक्के कर्मचारी उपस्थित राहतील.

 काय आहे नव्या नियमावलीत

  • हॉटेल आणि लॉज 100 टक्के सुरु होणार.
  • शाळा आणि कॉलेज 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार.
  • 30 सप्टेंबरपर्यंत मेट्रो धावणार नाही.
  • खासगी बस आणि मिनी बसला प्रवासासाठी मुभा.
  • सिनेमागृह 30 सप्टेंबरपर्यंत राहणार बंद.
  • मंदिर आणि जिमबद्दल अद्याप घोषणा नाही
  • सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, थेटर्स आणि बिअर बारवरील बंदी कायम
  • संस्कृतिक, सामाजिक, क्रीडा शैक्षणिक क्षेत्रातले कार्यक्रम तसेच मोठ्या प्रमाणात लोकांना एकत्र येता येणार नाही
  • आवश्यक सेवेतील सर्व दुकाने आधीच या नियमावलीचे पालन करतील
  • प्रवास करताना चालकासह टॅक्सीत चार तर रिक्षामध्ये तीन प्रवाशांना मुभा
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.