‘उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसमोर छोट्या मुलांसारख्या अटी ठेवल्या’; मंत्री Uday Samant यांची टीका

118
‘उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसमोर छोट्या मुलांसाख्या अटी ठेवल्या’; मंत्री उदय सामंत यांची टीका
‘उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसमोर छोट्या मुलांसाख्या अटी ठेवल्या’; मंत्री उदय सामंत यांची टीका

Uday Samant : शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे पक्षप्रमख राज ठाकरे यांनी एकत्र येत संभाव्य युती (Uddhav Thackeray Raj Thackeray alliance) करण्यासंदर्भात राजकीय चर्चा चालू आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या समोर अगदी छोट्या मुलांसारख्या अटी ठेवल्या आहेत. अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे (Shiv Sena) नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये केली. (Uday Samant)

मंत्री उदय सामंत मंगळवारी मुंबईत पत्रकारांशी (Uday Samant Press conference) बोलताना म्हणाले की, राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या विषयावर मी यापूर्वीच माझी भूमिका स्पष्ट केली आहे. लहान मुले जसे शाळेत डबा खाताना तू याच्याशी बोलू नको, त्याच्याशी बोलू नको, तरच मी तुला चपाती खायला देतो अशा अटी घालतात. तशाच अटी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंपुढे ठेवल्या आहेत. त्यामुळे राज ठाकरे या अटी मान्य करतील असे मला वाटत नाही. त्यांचा एक विचार आहे. त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांना झुकवून कुणी युती करण्याचा प्रयत्न करत असेल तर तो यशस्वी होणार नाही असे मला वाटते.

(हेही वाचा – Hutatma Chowk : संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बलिदान देणाऱ्यांच्या स्मृती जागवणारे मुंबईतील हुतात्मा स्मारक)

तसेच आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरेंवर मुंबईतील भूखंड घोटाळ्याचा बादशहा असा आरोप केला आहे. पत्रकारांनी याविषयी उदय सामंत (Uday Samant) यांना छेडले असता त्यांनी या प्रकरणाची आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले. मी या प्रकरणाची माहिती घेतो, अभ्यास करतो व त्यानंतर बोलतो, असे ते मिश्किलपणे बोलताना म्हणालेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.