
Ashish Shelar यांनी शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर सडकून टीका केली. काही दिवसांपूर्वीच आशिष शेलार यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याशी असलेले वैयक्तिक मैत्रीचे संबंध पक्षीय राजकारणाच्या आड येत असतील तर ‘वैयक्तिक मित्र वैगेरे विषय संपला’, असे म्हटले होते. त्यानंतर आता आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. (Ashish Shelar)
(हेही वाचा – Dr. Ghaisas Case : आयएमए, हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा)
दरम्यान, मुंबईतील गरवारे क्लबमध्ये (Mumbai Garware Club) पार पडलेल्या भाजपाच्या कार्यशाळेत बोलताना भाजपा मंत्री तथा आमदार आशिष शेलार म्हणाले की, मुंबई शहरातील सर्व जमिनींवर होणाऱ्या लँड स्कॅमचा बादशाह (Uddhav Thackeray king of land scams) हे उद्धव ठाकरे आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात सतत लँड आणि लँड स्कॅम असे विचार सुरु असतात. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काही नवीन बोलणे सोडून दिले आहे. ते सतत ही जमीन अदानीला दिली, ती जमीन अंबानीला दिली, असेच बोलत असतात, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.
मुंबई महानगरपालिका २५ वर्षे उद्धव ठाकरे यांच्याकडे होती. आजघडीला मुंबईतील एक चौरस फूट क्षेत्रफळाची जागा लाखोंच्या घरात आहे. पण उद्धव ठाकरे यांनी पालिकेत त्यांची सत्ता असताना बिल्डरांना 1 कोटी चौरस फूट क्षेत्र फुकटात देण्याचे काम केले. ते आम्हाला काय जाब विचारतील, असा आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
(हेही वाचा – रस्त्यात अडथळा निर्माण करणारी Mazar केली जमीनदोस्त; उत्तराखंडमध्ये प्रशासनाची धडक कारवाई)
वक्फ बोर्ड कायद्यावरूनही केली टीका
आशिष शेलार यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडून वक्फ कायद्यावर खोटी माहिती पसरवली जात असल्याचाही आरोप केला. ते म्हणाले, उद्धव ठाकरे वक्फ बोर्ड कायद्याविषयी चुकीची माहिती पसरवत आहेत. तुमची संपत्ती घेणार, मशीद घेणार, स्मशानभूमी घेणारे असे ते म्हणत आहेत. पण या देशात कायदा आहे. त्यामु्ळे तसे काहीही करता येणार नाही. वक्फ विधेयक हे गरीब मुस्लिमांच्या फायद्यासाठी आहे. नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सरकार वक्फ बोर्डाने घेतलेल्या जमिनी पुन्हा देण्याचे काम करत आहे. आम्ही आयुष्यभर विरोधी पक्षात होतो. पण आम्ही केव्हाच संसदेचे कायदे मानणार नाही असे म्हणालो नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community