संजय राऊत असताना उद्धव ठाकरेंना शत्रूची गरज नाही; Girish Mahajan यांचा घणाघात

43
संजय राऊत असताना उद्धव ठाकरेंना शत्रूची गरज नाही; Girish Mahajan यांचा घणाघात
  • प्रतिनिधी

“संजय राऊत असताना उद्धव ठाकरेंना कोणत्याही शत्रूची गरजच नाही”, असा घणाघात करत भाजपाचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी शिवसेना उबाठावर आणि खासदार संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे. संजय राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना महाजन यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “राऊतांच्या बडबडीला कंटाळून शिवसेना उबाठात आता कोणीही थांबायला तयार नाही.”

राऊतांनी उद्धव ठाकरेंना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर बसवलं

गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांची हत्या संजय राऊतांनीच केली. त्यांनी उद्धव ठाकरेंना शरद पवारांच्या मांडीवर नेऊन बसवलं, काँग्रेसच्या दावणीला बांधलं आणि त्यातून शिवसेनेचं मूळ तत्वच हरवलं.”

(हेही वाचा – Terrorism : दहशतवादाला सीमा नाही, सर्व देशांनी एकत्रित लढा देण्याची गरज; लायबेरिया प्रजासत्ताकच्या संसदेत भारताची परखड भूमिका)

“मी संघाचा स्वयंसेवक, पक्षासाठी २० वर्षे विरोधात बसलो”

संजय राऊत यांनी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर “दलाल” असा आरोप केल्यावर त्यांना प्रत्युत्तर देताना महाजन म्हणाले, “मी गेली ३५ वर्षे सात वेळा आमदार झालो आहे. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता आहे. वीस वर्षे विरोधात बसलो तरी पक्ष कधी सोडला नाही. सत्ता गेल्यावर पक्ष सोडणारा मी नाही. उलट, संजय राऊत यांनीच पक्ष संपवण्याचे काम केले आहे.”

“पत्राचाळ प्रकरणात जेलमध्ये गेलेले राऊत मला शिकवणार?”

महाजन (Girish Mahajan) यांनी राऊतांना इशाराही दिला की, “पत्राचाळ प्रकरणात जे राऊत जेलमध्ये गेले होते, त्यांनी मला बोलायला लावू नये. त्यांनी किती दलाली केली, ते सगळ्यांना माहीत आहे.” त्यांनी हेही म्हटले की, “शिवसेना उबाठाच्या उरलेल्या अस्तित्वालाही संजय राऊतच संपवतील. आता अनेक लोक पक्ष सोडत आहेत आणि अजूनही सोडणार आहेत.”

(हेही वाचा – BMC : महापालिकेच्या उद्यानातच निर्माण होतात डासांचे अड्डे; प्रशासनाचे दुर्लक्ष)

“देवच उद्धव ठाकरेंचे भले करो”

शेवटी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी एक उपरोधिक टोला लगावत म्हटले, “संजय राऊत असताना उद्धव ठाकरेंना कोणत्याही शत्रूची गरज नाही. देवच उद्धव ठाकरेंचे भले करो!” या शाब्दिक युद्धामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची धार वाढली असून, याचे पडसाद आगामी राजकीय घडामोडींमध्ये उमटण्याची शक्यता आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.