CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील सैनिकी शाळांना नवसंजननाचा मार्ग मोकळा झाला आहे! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सैनिकी शाळांच्या शैक्षणिक दर्जात आमूलाग्र सुधारणा करण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठीत करण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. सह्याद्री अतिथीगृह (Sahyadri Guest House) येथे आयोजित आढावा बैठकीत त्यांनी सैनिकी शाळांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी धोरणात्मक बदलांची गरज व्यक्त केली. (CM Devendra Fadnavis)
(हेही वाचा – Jammu and Kashmir मधील नादेर-त्रालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू)
(हेही वाचा – Award : इन्क्रेडिबल इंडिया, इन्क्रेडिबल पीपल अवॉर्ड्सच्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील अज्ञात हिरोंचा गौरव)
सैनिकी शाळांचे धोरण नेतृत्वाभिमुख आणि राष्ट्रप्रेमी विद्यार्थी घडवण्याच्या दृष्टिकोनातून आखले गेले आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या हिताचे धोरणात्मक निर्णय घेतले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. या निर्णयामुळे सैनिकी शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याबरोबरच विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल होण्याची आशा निर्माण झाली आहे. यावेळी बैठकीत शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावर, माजी मंत्री राजेश टोपे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हेही पहा –