PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगाल दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल सरकारवर (Trinamool Govt) निशाणा साधला. राज्यातील शिक्षक भरती घोटाळ्याचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, टीएमसीने (TMC) भ्रष्टाचाराच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, तृणमूल काँग्रेस सरकारने केवळ चुकीच्या पद्धतीने नोकऱ्या दिल्या नाही. तर शिक्षकांच्या कुटुंबांनाही उद्ध्वस्त केले. तसेच तृणमूल काँग्रेसच्या भ्रष्टाचारामुळे बंगालमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. जनता म्हणत आहे की, त्यांना आता तृणमूल काँग्रेसचे सरकार नको आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, तृणमूल काँग्रेसचे नेते भ्रष्टाचारात बुडाले आहेत. पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगाल सरकारची तुलना एका निर्दयी सरकारशी केली, जरी त्यांनी आपल्या भाषणात ममता बॅनर्जी यांचे नाव घेतले नाही. त्यांनी टीएमसी सरकार असे म्हणत हल्लाबोल केला. (PM Narendra Modi)
(हेही वाचा – IPL 2025, RCB in Top 2 : बंगळुरू संघात विराट कोहलीचं डोकं कोण खातं?)
टीएमसी चूक स्वीकारण्यास तयार नाही
अलीपुरद्वार येथील भाजपाच्या रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पश्चिम बंगालच्या (WB PM Narendra Modi meeting) ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, पश्चिम बंगाल अनेक संकटांनी वेढलेले आहे. पहिले संकट म्हणजे समाजात पसरलेला हिंसाचार आणि अराजकता. दुसरे संकट म्हणजे माता आणि बहिणींची असुरक्षितता. तिसऱ्या संकटामुळे तरुणांमध्ये प्रचंड निराशा पसरत आहे. टीएमसी आपली चूक मान्य करायला तयार नाही. घोटाळेबाजांनी शेकडो लोकांना अंधारात ढकलले. तृणमूल काँग्रेस सरकार दोषींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.
९०,००० कोटी रुपयांचे प्रकल्प अडकले
पंतप्रधान मोदी म्हणाले की, मुर्शिदाबाद आणि मालदामध्ये जे काही घडले, ते येथील टीएमसी सरकारच्या निर्दयतेचे उदाहरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, केंद्र सरकारच्या योजना बंगालमध्ये लागू झालेल्या नाहीत. त्यांनी आयुष्मान योजनेपासून ते पंतप्रधान रस्ते योजनेपर्यंत सर्व योजनांचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, तृणमूल काँग्रेस सरकारचा विकासाशी काहीही संबंध नाही. पंतप्रधान मोदी म्हणाले की, बंगाल सरकारने ९० हजार कोटी रुपयांचा प्रकल्प थांबवला आहे. पंतप्रधान मोदींनी यामध्ये महामार्ग आणि मेट्रो सारख्या प्रकल्पांचा समावेश केला आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, तृणमूल काँग्रेस सरकारने ते मध्येच तात्काळत ठेवले आहे.</h
#WATCH | Alipurduar, West Bengal | PM Narendra Modi says, “Whatever happened in Murshidabad and Malda was an example of the government’s ruthlessness here… In the name of appeasement, hooliganism was given a free hand. Imagine the horrific situation when the people of a party… pic.twitter.com/mUVL0xEp49
— ANI (@ANI) May 29, 2025