“किती विमाने कोसळली हा मुद्दा नाही, तर …” ; CDS Anil Chauhan यांचे पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याबद्दल मोठे विधान !

"किती विमाने कोसळली हा मुद्दा नाही, तर ..." ; CDS Anil Chauhan यांचे पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याबद्दल मोठे विधान !

159
"किती विमाने कोसळली हा मुद्दा नाही, तर ..." ; CDS Anil Chauhan यांचे पाकिस्तानने भारताचे विमान पाडल्याबद्दल मोठे विधान !

पाकिस्तानशी झालेल्या संघर्षात भारतीय लढाऊ विमाने पाडण्यात आल्याच्या दाव्यांवर संरक्षण प्रमुख अनिल चौहान (CDS Anil Chauhan) यांनी प्रथमचं काल (31 मे) भाष्य केले. त्यांनी सांगितले की खरा मुद्दा किती विमाने पाडण्यात आली हा नाही तर ती का पाडण्यात आली हा आहे. सीडीएस यांनी ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत हे सांगितले. ते शांग्री-ला संवाद कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले असताना त्यांनी यावर भाष्य केलं. (CDS Anil Chauhan)

भारताने आपल्या चुका ओळखल्या
ब्लूमबर्गकडून पाकिस्तानने संघर्षादरम्यान भारतीय विमाने पाडली का? तुम्ही याची पुष्टी करू शकता का? असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर सीडीएस चौहान (CDS Anil Chauhan) यांनी सांगितले की, “खरा मुद्दा किती विमाने पाडण्यात आली हा नाही, तर ती का पाडण्यात आली आणि आपण त्यांच्याकडून काय शिकलो हा आहे. भारताने आपल्या चुका ओळखल्या, त्या लवकर दुरुस्त केल्या आणि नंतर दोन दिवसांत लांब पल्ल्यावरून शत्रूच्या लक्ष्यांना लक्ष्य करून पुन्हा एकदा प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले.” (CDS Anil Chauhan)

 

9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त

सीडीएस चौहान (CDS Anil Chauhan) यांनी सांगितले की, हे पूर्णपणे चुकीचे असून मोजणी महत्त्वाची नाही, पण आपण काय शिकलो आणि आपण कसे सुधारलो हे महत्त्वाचे आहे. या संघर्षात अण्वस्त्रे वापरण्याची कधीही गरज नव्हती, जी दिलासा देणारी बाब आहे. भारताने 7 मे रोजी पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. (CDS Anil Chauhan)

विचारपूर्वक केलेल्या रणनीतीचा परिणाम
सीडीएस जनरल अनिल चौहान (CDS Anil Chauhan) यांनी शांग्री-ला संवाद कार्यक्रमात ‘भविष्यातील युद्ध’ या विषयावर भाषण दिले. पाकिस्तानशी असलेल्या संबंधांबद्दल ते म्हणाले, “आता भारत कोणत्याही रणनीतीशिवाय काहीही करत नाही. पाकिस्तानशी राजनैतिक संबंध राखण्याचे युग संपलं आहे. दोन्ही हातांनी टाळी वाजवावी लागते, परंतु जर बदल्यात फक्त शत्रुत्व मिळाले तर अंतर राखणे हा एक शहाणपणाचा निर्णय आहे. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा सामाजिक विकास, जीडीपी किंवा दरडोई उत्पन्न अशा अनेक बाबींमध्ये पाकिस्तान भारताच्या पुढे होता. आता परिस्थिती बदलली आहे. आता भारत प्रत्येक आघाडीवर पाकिस्तानच्या पुढे आहे. हा बदल कोणत्याही योगायोगामुळे नाही तर विचारपूर्वक केलेल्या रणनीतीचा परिणाम आहे.” (CDS Anil Chauhan)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.