पहलगाम हल्ल्याच्या विरोधात भारताने Indus Waters Treaty हा करार तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा करार 1960 पासून चालू आहे, म्हणजे 65 वर्ष हा करार चालू आहे, तो करार मोदींनी रद्द नाही केला सस्पेंड केला आणि रद्द का केला नाही कारण त्या करारामध्ये एक्झिट कलमच नाही. हा गुलाब चाचाने (भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू) केलेला करार Indus Waters Treaty आहे. त्या गुलाब चाचांना पाकिस्तानच भले व्हावे म्हणून केलेला हा करार आहे. भारताची जेव्हा फाळणी झाली तेव्हा अतिशय समृद्ध आणि कालव्यांचे जाळ असलेला पूर्व पंजाब हा पाकिस्तानला देऊन टाकण्यात आला, चाचाला तर भूगोलाची अक्कलच नव्हती किंवा त्याला पाकिस्तानच भले करायचे होते म्हणून तो पाकिस्तानला दिल्यावर भारतामध्ये दुष्काळ पडण्याची परिस्थिती आली म्हणून तातडीने सतलज नदीवरती आपल्याला भाक्रानांगल धरण बांधायला लागले, असा हल्लाबोल आंतराष्ट्रीय विषयांवरील अभ्यासक चंद्रशेखर नेने यांनी हिंदुस्थान पोस्टच्या युट्युब चॅनलवर बोलताना केले.
पहलगाम हल्ल्याच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाला गेलेले होते, सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांची मोदींची विशेष मैत्री आहे. सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असतानाच पहलगावमध्ये हल्ला झाला. त्यामुळे पंतप्रधान मोदी तातडीने मायदेशी परतले पण त्याआधी त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांना तातडीने काश्मीरमध्ये जाण्यास सांगितले. पंतप्रधान मोदी यांचे विमान विमानतळावर उतरले आणि तिथेच त्यांनी बैठक घेतली. त्यानंतर सुरक्षेवर उच्च स्तरीय बैठक घेतली. या बैठकीत पाच निर्णय घेण्यात आले. त्यात सिंधू नदी पाणी करार Indus Waters Treaty स्थगित केला.
(हेही वाचा भारताने Indus Waters Treaty थांबवल्यावर काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी तोडले अकलेचे तारे; म्हणाले)
काँग्रेसकडे करार रद्द करण्याची धमक नव्हती
सिंधू सर्वात मोठी नदी आहे. बाकी सगळ्या नद्या शेवटी सिंधूला जाऊन मिळतात, पहिली सिंधू त्याच्यानंतर जी नदी येते ती झेलम त्याच्यानंतर येते चिनाब त्याच्यानंतर रावीमध्ये एक बियास नावाची छोटी नदी आहे आणि शेवटची सतलज या सगळ्या नद्या वैदिक काळापासून तिथे आहेत आणि वेदांची रचना त्या नद्यांच्या काठ्यावर झालेली असल्यामुळे तिथे पूर्वी एक सरस्वती नावाची नदी पण होती जी पुढे लुप्त झाली तर या नद्यांना वैदिक काळात वेगळी नाव होती. या नद्यांचे पाणी पाकिस्तानला कसं मिळेल याची काळजी गुलाब चाचांना होती, त्यासाठी त्यांनी सतलज, बियास आणि रावी या ज्या भारताकडच्या नद्या आहेत ज्यांना पूर्वेकडच्या नद्या म्हणण्यात येते, त्या नद्यांचे पाणी 100 टक्के भारताने वापरायचे यातील बियास नदी तर भारतातच संपते. सर्वात मोठी नदी सिंधू, त्याहून दुसरी मोठी नदी झेलम आणि चिनाब या तिन्ही नद्यांचे 80 टक्के पाणी पाकिस्तानला द्यायचे या करारात Indus Waters Treat ठरवले, त्यातील केवळ 20 टक्के पाणी भारताने वापरायचे असे ठरले. या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी गुलाब चाचा कराचीत गेला होता. पाकिस्तानच्या नेत्यांना दिल्लीत बोलावता आले असते, भारत हा मोठा देश आहे. या करारासाठी पाकिस्तानकडे पैसाही नव्हता. भिकारी पाकिस्तानला अनेक देशांनी पैसे दिले. चीड येणारी बाब म्हणजे त्यावेळी भारताने सहा कोटी 20 लाख पाऊंड पाकिस्तानला दिले ज्यांनी १९४८ मध्ये भारतावर हल्ला केला होता. पाकिस्तानने भारतावर केलेला हा पहिला हल्ला होता. पण गुलाब चाचाला याचा विसर पडला होता. आता काँग्रेसवाले म्हणतात, पाकिस्तानसोबत चार लढाया झाल्या तरीही हा सिंधू नदी पाणी करार Indus Waters Treaty कायम राहिला, अरे कशाला मोडतील करार, हा करार पाकिस्तानच्या फायद्याचाच आहे. पाकिस्तान मोडणारच नव्हता, तुमच्यात धमक हवी होती, तुम्ही मोडला नाही आता मोदी सरकारने ही धमक दाखवली आहे. मोदींनी हा करार सध्या तात्पुरता सस्पेंड केलेला आहे. पाणी एकदा थांबलं की पाकिस्तान कोरडा पडेल, पाकिस्तानात पाण्याचा दुसरा सोर्सच नाही, असेही नेने म्हणाले.
Join Our WhatsApp Community