Rahul Gandhi म्हणजे एक जुमला; ‘द ग्रेट खली’ यांची टीका

130

काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आधीच हार पत्करली आहे, म्हणूनच त्यांच्या जागी काँग्रेसला मल्लिकार्जुन खरगे यांना आणावे लागले. मात्र तरीही काँग्रेस आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) हे एक जुमला आहे. त्यामुळे देशात पुन्हा भाजपाचे सरकार येईल असा विश्वास भाजपा नेते, माजी WWE रेस्लर दलीप सिंग राणा उर्फ ‘द ग्रेट खली’ने यांनी व्यक्त केला.

(हेही वाचा Love Jihad मध्ये प्राण गमावलेल्या हिंदू मुलीचे वडील काँग्रेसच्या नगरसेवकाची जे.पी. नड्डा यांनी घेतली भेट)

राहुल गांधी पूर्णपणे अपयशी

रविवारी थेट राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर हल्ला चढवत त्यांना ‘जुमला’ म्हटले आहे. राहुल गांधी स्वतः एक ‘जुमला’ झाले आहेत. त्यांना नेमके काय करायचे आहे, हेच माहीत नाही. राहुल गांधी जेव्हा पूर्णपणे अपयशी ठरले, तेव्हा काँग्रेसने मल्लिकार्जुन खरगे यांना पक्षाध्यक्ष केले. खरगे यांना अपमानाचा सामना करण्यासाठी पुढे आणले आहे. खली राजस्थानातील बाडमेर येथे बोलत होते. खली म्हणाले, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आधीच पराभव स्वीकारला आहे. यामुळेच खरगे यांना पुढे करण्यात आले आहे. ते शर्यतीतून बाहेर पडले आहेत. बाडमेर, जैसलमेर येथून विद्यमान खासदार कैलाश चौधरी यांच्या समर्थनार्थ राणा लोकसभा निवडणुकीत प्रचार करत आहेत. कैलाश चौधरी हे काँग्रेसचे उमेदवार उमेदा राम बेनिवाल आणि अपक्ष रवींद्र सिंह भाटी यांच्या विरोधात लढत आहेत. याचवेळी, भाजपाचे केंद्र आणि राज्यात सरकार असेल तर, विकास होईल आणि मला विश्वास आहे की, भाजपात दोन्ही ठिकाणी सरकार स्थापन करेल, असेही ‘ द ग्रेट खली’ने म्हटले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.