ऑपरेशन सिंदूरध्ये भारताच्या मेड इन इंडिया संरक्षण शस्त्रास्त्रांची क्षमता पाहिली. आपली एकता आपली मोठी शक्ती आहे. हे युग जसे युद्धाचे नाही, तसे हे युग दहशतवादाचेही नाही. पाकिस्तानी सैन्य आणि सरकार ज्याप्रकाने दहशतवादाला खतपाणी घालत आहे, एक दिवस ते पाकिस्तानचा समूळ नाश करतील. पाकिस्तानला जर वाचायचे असेल तर त्यांना दहशतवादाचे समूळ उच्चाटन करावे लागेल. टेरर आणि टॉक, टेरर आणि ट्रेड एकसाथ चालणार नाही, तसेच पाणी आणि खून एक एकत्र वाहू शकत नाही, असा कडक शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ठणकावून सांगितले. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर पंतप्रधान मोदी यांनी प्रथमच सोमवारी, रात्री आठ वाजता देशवासियांना संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते.
…तर असा पोलादी निर्णय घेतला जातो
आमच्या बहिणी आणि मुलींच्या कपाळावरील सिंदूर मिटवण्याची किंमत दहशतवाद्यांना आता कळली असेल, सिंदूर ऑपरेशन हे कोट्यवधी भारतवासीयांच्या भावनांचे प्रतीक आहे, हे ऑपरेशन न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे. ६ मे रोजीची रात्र आणि ७ मे रोजीची सकाळ जगाने ही प्रतिज्ञा परिणामांमध्ये बदलल्याचे पाहिले आहे. भारतीय सैन्याने दहशतवादाच्या तळांवर अचूक मारा केला आहे. दहशतवाद्यांनी स्वप्नातही अशा हल्ल्याचा अविचार केला नसेल. राष्ट्र प्रथम भावना असेल तर असा पोलादी निर्णय घेतला जातो, जेव्हा पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर भारतीय क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले होत होते तेव्हा दहशतवाद्यांच्या थरकाप उडाला होता, असेही पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.
भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला
जगात जिथे कुठे दहशतवादी हल्ले त्यांचे कोणते ना कोणते संबंध पाकिस्तानातील दहशतवादी तळांशी जोडलेले होते. भारताच्या या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले आहे. दहशतवाद्यांचे म्होरके उघडपणे पाकिस्तानात फिरत होते, त्यांना भारताने एका झटक्यात संपवले आहे. भारताच्या कारवाईने पाकिस्तान घोर निराशेत गेला आणि त्यातूनच त्याने आणखी एक दुस्सासन केले. पाकिस्तानने भारतावरच पलटवार केले. प्रार्थना स्थळे, शाळा, नागरी वस्त्यांवर हल्ले केले, त्यानंतर भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला, असेही पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.
Join Our WhatsApp Community