Surrender Gandhi : राहुल गांधींच्या ‘त्या’ विधानाला भाजपाचं सडेतोड प्रत्युत्तर; अमेरिकन गोपनीय कागदपत्रांचा दाखला देत…

Surrender Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शेलक्या शब्दांत टीका केली होती. ऑपरेशन सिंदूरबाबत बोलताना राहुल गांधी(Surrender Gandhi) यांनी पंतप्रधानांवर टीका करताना नरेंदर, सरेंडर, असा शब्दप्रयोग केला होता.

67

Surrender Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शेलक्या शब्दांत टीका केली होती. ऑपरेशन सिंदूरबाबत बोलताना राहुल गांधी(Surrender Gandhi) यांनी पंतप्रधानांवर टीका करताना नरेंदर, सरेंडर, असा शब्दप्रयोग केला होता. त्यानंतर आता भाजपाकडून राहुल गांधीं(Surrender Gandhi)ना जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. भाजपा नेते तथा खासदार डॉ. निशिकांत दुबे यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी आपल्या ‘एक्स’वर पोस्ट करत काँग्रेस नेत्यांची पोलखोल केली आहे.(Surrender Gandhi)

 

डॉ. निशिकांत दुबे यांनी राहुल गांधींना जाब विचारत अनेक दावे केले आहेत. त्यांनी गांधी कुटुंबाच्या निर्णयावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. यावेळी भाजपा नेते डॉ. दुबे यांनी अमेरिकेच्या गोपनीय कागदपत्रांचा पुरावा दिला. त्यानुसार, माजी पंतप्रधान राजीव गांधी पाकिस्तानी नेते जनरल झिया-उल-हक आणि पंतप्रधान मुहम्मद खान जुनेजो यांना का भेटले असा प्रश्न दुबे यांनी उपस्थित केला आहे. ही भेट अमेरिकन दबावाखालील आत्मसमर्पण असल्याचे दुबे म्हणाले.

(हेही वाचा बकरी ईदसाठी Mumbai Local मधून बकऱ्यांची अवैध वाहतूक; प्रवाशांकडून संताप व्यक्त )

तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी डिसेंबर १९८५ मध्ये दिल्लीत झिया यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी एकमेकांच्या अणुवस्त्रांवर हल्ला न करण्याचा करार केला होता. १९८८ च्या भारत-पाकिस्तान अणुकराराचा भाग म्हणून जुनेजो यांच्यासोबतच्या १९८६च्या पुढील भेटीत सार्क शिखर परिषदेदरम्यान भेटी झाल्या होत्या. तसेच, पंजाबमधील शीख असंतुष्टांशी पाकिस्तानी संगनमताचे पुरावे उद्धृत करून अविश्वासामुळे सहभागी होण्यास भारताची अनिच्छा असल्याचे दस्तऐवजात नमूद केले आहे.

 

शिमला करार महत्त्वाचा नसतानाही, तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींनी सुपर कॉम्प्युटर आणि लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट(एलसीए) विमानाच्या रुपात पाकिस्तानसमोर गुडघे टेकले की नाही?. तसेच, ड्रग्ज तस्करीबाबत पाकिस्तान-भारत-अमेरिकेच्या प्रतिनिधींची बैठक हा देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये अमेरिकेचा हस्तक्षेप मानावा की नाही? तर या पेपरमध्ये अमेरिकेने पाकिस्तानच्या नेतृत्वासाठी पैशाबद्दलही बोलले आहे, मग भारतानेही पैशासाठी आत्मसमर्पण केले का?, असे अनेक प्रश्न भाजपा नेते निशिकांत दुबे यांनी आता उपस्थित केले आहेत.

(हेही वाचा Bengaluru Stampede : काँग्रेस सरकारचा असंवेदनशीलपणा पहा, पोलिसांनी सांगूनही विजयी रॅलीचे आयोजन; क्रीडा पत्रकाराने व्हिडिओत काय म्हटले? )

तत्कालीन पंतप्रधान नेहरू- पाकिस्तानी फील्ड मार्शल अयुब खान यांच्यातील पत्रव्यवहाराचा दाखला देत निशिकांत दुबे यांनी नवा सवाल उपस्थित केला. भारताचे पहिले पंतप्रधान नेहरुंवर निशाणा साधताना डॉ. दुबेंनी म्हटले की, १५ नोव्हेंबर १९६२ रोजी चीन-भारत युद्धादरम्यान लिहिलेले एक अवर्गीकृत पत्र शेअर केले आहे. नेहरूंनी पाकिस्तानच्या फील्ड मार्शल अयुब खान यांना लिहिलेल्या पत्रात अमेरिकेची लष्करी मदत मागितली होती. नेहरू असे म्हणाले होते की, आमचे मतभेद काहीही असोत, या उपखंडातील स्थिरता आणि शांततेला होणारा अडथळा हा आमच्यासाठी सामान्य चिंतेचा विषय आहे. तर अमेरिकेने हे पत्र पाकिस्तानला शेअर केल्याने भारताचा कमकुवतपणा उघड झाल्याचा आरोप भाजपा नेते दुबे यांनी केला आहे. (Surrender Gandhi)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.