राज्य महिला आयोगाची ‘Aarogya Wari’, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

65
टाळ मृदुंगाच्या गजरात तुकोबारायांची देहूनगरी आणि ज्ञानोबारायांची आळंदीनगरी विठ्ठलाच्या नामघोषाणे दुमदुमून निघाली आहे. दरम्यान देहूनगरीतून (Dehu) तुकोबारायांची पालखी पंढरपूरच्या (Pandharpur) दिशेने मार्गस्थ झाली आहे. तर ज्ञानोबारायांची पालखी १९ जूनला पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. यामध्ये मोठ्या संख्येने वारकरी बंधु-भगिनी सामील झाले आहेत. तसेच यंदा राज्य शासनाने आषाढी वारीसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये स्वच्छतेला जास्तीत जास्त महत्त्व देण्यात येत असून, राज्य महिला आयोगानेही (State Women Commission) वारीदरम्यान (Ashadhi Wari) महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. तर या आरोग्य वारीची मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. (aarogya wari)

(हेही वाचा – Water Cut : कुर्ल्यासह पवई आणि विक्रोळीकरांनो रविवारीच भरुन ठेवा पाणी; कारण…)

यंदाची आषाढी वारी माहिला भगिनींसाठी खास असणार आहे. राज्य शासनाने आषाढी वारीसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये महिलांच्या मासिक पाळीतील अडचणीला लक्षात घेऊन सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग यंत्रे, नष्टीकरणासाठी इन्सीनरेशन यंत्रे आदी उपलब्ध करुन देण्यासाठी घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि पुणे महानगरपालिकेच्यावतीने आयोजित ‘आरोग्य वारी’ उपक्रमाचे उद्घाटन निवडुंगा विठोबा मंदिर येथे करण्यात आले. (Chandrakant Patil)
याप्रसंगी बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, आजच्या काळानुसार महिलांच्या गरजा बदललेल्या असून, त्यानुसार योजना आणि सेवा आखणं काळाची गरज आहे. निर्मल ग्राम संकल्पनेप्रमाणेच ‘आरोग्यवारी’ सारख्या उपक्रमातून महिलांसाठी विश्रांतीगृहे, स्वच्छतागृहे आणि पोलिसांशी समन्वय यांचे नियोजन अत्यंत सकारात्मक पाऊल आहे.त्यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी वारीमध्ये मोबाईल टॉयलेट्सची व्यवस्था आणि सुधारणा यावर भर दिला. मी स्वतः काही वेळा या टॉयलेट्सचा वापर केलेला आहे. अजून त्यात सुधारणा होणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद व महानगरपालिका यांचे सातत्यपूर्ण सहकार्य महिलांना दिलासा देऊ शकते, असे त्या म्हणाल्या.

(हेही वाचा – Suicide Case : विलेपार्लेच्या साठ्ये कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; घातपात असल्याचा कुटुंबियांचा आरोप)

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (दूरदृष्य प्रणालीद्वारे), आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार चेतन तुपे, माजी आमदार सुनील टिंगरे, आयोगाच्या सचिव नंदिनी आवडे, पीएमपीएमएलच्या अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप कदम, सुनील बल्लाळ, माजी नगरसेवक विशाल धनवडे आदी उपस्थित होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.