राज्यभरात विशेष ग्रामसभा होणार; Women’s Day निमित्त राज्य महिला आयोगाचा पुढाकार

489

जागतिक महिलादिनानिमित्त (Women’s Day) शनिवार, ०८ मार्चला राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित (Women’s Day Special Gram Sabha) करण्यात येणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या (Maharashtra State Commission for Women) संकल्पनेनुसार बालविवाह रोखणे, विधवा प्रथा बंद करणे, तसेच महिला सुरक्षिततेसाठीचे ठराव या ग्रामसभांमध्ये मांडण्यात येणार आहेत. तसेच महिला आयोगाच्या मागणीनुसार ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे निर्देश दिनांक 6 मार्च रोजी पत्राद्वारे दिले आहेत. या प्रकरणी महिला आयोगाच्या रूपाली चाकणकर यांनी माहिती दिली आहे. (Women’s Day)

(हेही वाचा – India-Pakistan Railway Track वर सापडला हँड ग्रेनेड; सुरक्षा यंत्रणा सतर्क)

रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) म्हणाल्या, पुरोगामी व प्रगत राज्य असलेल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बालविवाह होत आहेत. महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर असतानाही, विधवा महिलांना रूढी व अंधश्रद्धेमुळे जाचक प्रथांना सामोरे जावे लागत आहे. या सोबतच महिलांच्या सुरक्षिततेसाठी व्यापक स्तरावर जनजागृती व्हावी यासाठी विशेष ग्रामसभा बोलावून गावात बालविवाह होऊ न देणे, पतीच्या निधनानंतर महिलांना जाचक असणाऱ्या प्रथा बंद करणे, गावात मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी प्रयत्न करणे आणि महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणे असे ठराव करण्यात यावे अशी आयोगाची संकल्पना आहे. पुढे बोलताना रूपाली चाकणकर म्हणाल्या, संपूर्ण गावात असे ठराव शासकीय पातळीवर झाल्यास जनसामान्यांची वागणूक देत त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही अशा प्रयत्नांमधून बदलेल म्हणून आयोगाने अशी संकल्पना मांडली आहे. 

तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने या विशेष सभेची मागणी केली होती. महिला आयोगाच्या मागणीनुसार ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे निर्देश दिनांक 6 मार्च रोजी पत्राद्वारे दिले आहेत. या प्रकरणी महिला आयोगाच्या रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी माहिती दिली आहे.

(हेही वाचा – Madhya Pradesh High Court ने माहिती आयुक्तांना ठोठावला ४० हजारांचा दंड)

राज्यात पहिल्यांदाच महिलांच्या विषयांकरिता विशेष ग्रामसभा घेण्याचा निर्णय झाल्याने महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा मैलाचा दगड असल्याचेही चाकणकर म्हणाल्या. तसेच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विशेष ग्रामसभा आयोजित केल्याबद्दल रूपाली चाकणकर यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Rural Development Minister Jayakumar Gore) व राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांचे आभार मानले आहेत.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.