-
प्रतिनिधी
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरातील झोपडपट्टीधारकांच्या हक्काच्या घरांची लढाई आम्ही अखेरपर्यंत लढू, अशी ठाम ग्वाही मुंबई उपनगर पालकमंत्री अॅड. आशिष शेलार (Adv. Ashish Shelar) यांनी दिली आहे. केतकी पाडा, जानू पाडा, पिंपरी पाडा यांसारख्या वस्त्यांतील नागरिकांच्या मूलभूत सुविधांपासून वंचित अवस्थेची पाहणी करताना ते बोलत होते. शेलार यांच्या सोबत माजी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रवीण दरेकर, संजय उपाध्याय, जिल्हाध्यक्ष बाळा तावडे, गणेश खणकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी स्थानिकांच्या स्वाक्षरी मोहिमेला ही जोरदार सुरुवात करण्यात आली.
(हेही वाचा – Israel कडून इराणच्या अणू तळांवर हल्ला; दोन्ही देशांची किती आहे युद्धसज्जता?)
‘वन’ की ‘घर’? – झोपड्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न
अॅड. शेलार (Adv. Ashish Shelar) म्हणाले की, दहिसर ते मालाड-गोरेगाव दरम्यानच्या वन खात्याच्या जागेवरील ८० हजारांहून अधिक झोपडपट्ट्यांचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. या वस्त्यांमध्ये रहिवासी वन क्षेत्र घोषित होण्याआधीपासून राहत आहेत, त्यामुळे त्या झोपड्या हटवण्याचा आदेश अन्यायकारक ठरेल, असा मुद्दा त्यांनी मांडला. जिल्हा नियोजन समितीने या भागाला वन क्षेत्रातून वगळण्याचा ठराव पारित केला आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील या पुनर्विकास प्रक्रियेसाठी हिरवा कंदील दाखवला असून, सर्वोच्च न्यायालय व केंद्रीय मंत्रालयासमोर हा विषय पुढे नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
(हेही वाचा – मुंबईकरांनो सावधान! मध्य रेल्वेवर रविवारी Mega Block; जाणून घ्या काय आहे वेळापत्रक)
गरिबांच्या घरांचा लढा – भाजपाचा संकल्प!
स्वाक्षरी अभियान हे जनतेचा आत्मविश्वास आणि सशक्त भूमिका दर्शवणारे पाऊल असल्याचेही अॅड. शेलार (Adv. Ashish Shelar) यांनी सांगितले. “लढा एकेक टप्प्यात जिंकतो आहोत. झोपडपट्टीवासीयांच्या हक्कांसाठी भाजपा नेहमी मैदानात राहणार. हा फक्त राजकीय नाही, तर माणुसकीचा लढा आहे,” असेही त्यांनी ठणकावून सांगितले. गरिबांच्या हक्काचे घर आणि सुरक्षित भविष्य यासाठी सुरू आहे न थांबणारा संघर्ष – “ही फक्त झोपडी नव्हे, हे स्वप्न आहे!”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community