श्रद्धा वालकर प्रकरणी विशेष पोलीस पथकामार्फत चौकशी करणार; फडणवीसांची विधानसभेत घोषणा

132
श्रद्धा वालकर प्रकरणी विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करून चौकशी केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी विधानसभेत केली.
श्रद्धा वालकर हिची झालेली निर्घृण हत्या व त्या घटनेचे सामाजिक परिणाम लक्षात घेऊन अशा घटना पुन्हा घडू नये याबाबत कायदा करणार का? अशी विचारणा करीत आमदार अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी मांडली होती. यावर बोलताना आमदार आशिष शेलार यांनी या प्रकरणात काही गंभीर विसंगती असल्याने हे प्रकरण संशयास्पद असल्याचे निदर्शनास आणून दिले.

तत्कालीन सरकारच्या भूमिकेवर संशय

श्रद्धा वालकर हीने संबंधित आरोपीकडून आपल्याला मारहाण झाली होती, अशी तक्रार पोलीस ठाण्यात केली होती, मग गुन्हा दाखल करुन या प्रकरणाची चौकशी का करण्यात आली नाही? दोन्ही कुटुंबाला बोलावून जे लेखी घेण्यात आले त्याला एक वर्षे उशीर का झाला?  त्या कागदावर तारखेत खाडाखोड का करण्यात आली? असे प्रश्न शेलार यांनी उपस्थितीत केले. गेल्या अडीच वर्षांच्या काळात, तसेच तत्कालीन सरकारने घेतलेल्या भूमिका या संशयास्पद होत्या त्यामुळे या प्रकरणी कोणता दबाव होता का? अशी शंका येते. त्यामुळे विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करुन या प्रकरणी चौकशी करा, अशी आग्रही मागणी आशिष शेलार यांनी केली. ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.