मनसे आणि उबाठा शिवसेनेची आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत (BMC Elections) युती होईल का? दोन्ही ठाकरे एकत्र येतील का अशी शक्यता वर्तवली जात असली तरी युती करणे हे फक्त उबाठा सेनेच्याच मनात असल्याचे बोलले जात आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उबाठा बरोबर जाण्याचा कोणताही विचार केल नसला तरी उबाठाने राज ठाकरे यांना स्वीकारले आहे. आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या फलकावरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही संयुक्त शुभेच्छा देण्याचा प्रयत्न उबाठा शिवसेनेच्या युवा सेनेने केला आहे. याबाबतचे संयुक्त शुभेच्छा देणारे फलकच सध्या दादर, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (Chhatrapati Shivaji Maharaj Park) परिसरात लक्ष वेधून घेत आहेत. (UBT)
(हेही वाचा – चित्रपटांच्या तिकिटांच्या किमती नियंत्रित करण्यासाठी Kerala High Court मध्ये जनहित याचिका दाखल)
त्यातच उबाठा शिवसेना युवासेनेच्या वतीने न्यायमूर्ती रानडे मार्ग आणि समर्थ व्यायाम मंदिर रोडच्या चौकात लावलेले शुभेच्छांचे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस १३जून रोजी असून Daराज ठाकरेंचा वाढदिवस हा १४ जून रोजी आहे. दोन्ही ठाकरे काका-पुतण्याच्या वाढदिवसाच्या एकाच फलकावर संयुक्त पाने देण्यात आल्या आहेत. उबाठा शिवसेना युवासेनेच्या सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि रणजीत कदम यांनी काका आणि पुतण्याच्या वाढदिवसाच्या संयुक्त शुभेच्छा देणारे फलक लावून उबाठा शिवसेनेने राज ठाकरे स्वीकारले असल्याचे जाहीर करून टाकले.
(हेही वाचा – मराठा समजाच्या SEBC Reservation वर उच्च न्यायालयाची स्थगित नाही; अकरावीच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा)
आजवर उबाठा शिवसेनेवर, मनसेचा विश्वास नसून आधीच ही युतीची चर्चा असताना प्रकाश महाजन यांनी राणे कुटुंबाला दिलेले आव्हान आणि त्यानंतर उबाठा शिवसेनेचे आमदार तथा विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी महाजन यांची त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत उबाठाला मनसेची साथ हवी असून संपलेला पक्ष आता त्यांना हवाहवासा वाटू लागल्याने उबाठाची ही शेवटची धडपड असल्याचे बोलले जात आहे. उबाठा सेनेच्या युवा सेनेने आदित्य ठाकरे यांच्या बरोबरच राज ठाकरे यांना शुभेच्छा देण्याचा फलक लावताना आदित्य ठाकरे किंवा पक्षाच्या प्रमुख उद्धव ठाकरे यांची परवानगी घेतल्याशिवाय ही हिंमत केली नसेल असेही बोलले जात आहे. उबाठा सेनेच्या मुखपत्रात पहिल्या पानावर बातमी आणि त्यानंतर सर्व बाबी या मनसेला कवटाळण्याचा प्रयत्न होत असला मनसैनिकाना उद्धव ठाकरे यांच्या वापरा आणि काम झाल्यावर फेकून द्या या स्वभावामुळे कोणत्याही परिस्थितीत त्यांच्यासोबत जाण्याची इच्छा नाही. त्यामुळे एकाबाजूला पक्षाला गळती लागत असून भविष्यात हा पूर येण्याची भीती असल्याने मनसे सोबतच्या युतीची हवा निर्माण करून गळती रोखण्याचा प्रयत्न असल्याचेही बोलले जात आहे.
हेही पहा –