‘तोंड आवरा, पुन्हा आराम करायची वेळ येऊ नये’, शिंदे गटातील ‘या’ मंत्र्याचा राऊतांना थेट इशारा

78

सध्या राज्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा चिघळल्याने शिंदे सरकारवर षंढ अशी टीका करणाऱ्या संजय राऊत यांना सडेतोड उत्तर देण्यात आले आहे. शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी संजय राऊतांवर निशाणा साधात जरा तोंड आवरावं, सीमावादावर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. वादग्रस्त वक्तव्य करणं थांबवावीत, अन्यथा चोख उत्तर दिलं जाईल, असा थेट इशारा शंभूराज देसाई यांनी दिला आहे.

(हेही वाचा – कर्ज घेणं महागणार, सर्वसामान्यांना धक्का! RBI कडून रेपो रेटमध्ये ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढ)

काय म्हणाले शंभूराज देसाई

शंभूराज देसाई म्हणाले, राऊतांनी वापरलेल्या या शब्दाचा आम्ही तीव्र निषेध करतो. खुद्द संजय राऊत यांनाच बेळगाव न्यायालयाचे समन्स होते. तेव्हा न्यायालयाचे कवच असतानाही राऊत तिथे का गेले नाहीत, मग षंढ कोण असा प्रतिसवाल शंभूराज देसाईंनी राऊतांना विचारला आहे.

संजय राऊतांवर टीका करताना शंभूराज देसाई म्हणाले, मोठ्याने बोलायचं, बाह्या सावरून बोलायचं, ही पद्धत बोलायची कुणीही सहन करणार नाही. तुम्ही साडे तीन महिने आराम करून आला आहात. संजय राऊत तोंड आवरा. तुमच्या बडबडण्यावरून तुम्हाला बाहेरचं वातावरण सूट होत नाही असे दिसतेय. पुन्हा आराम करायची वेळ येऊ नये, त्यामुळे अशी वक्तव्य करणे टाळावीत, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

षंढ हा शब्द संजय राऊतांनी वापरला. राऊत स्वतः कोण आहेत? ज्याला 15 दिवसांपूर्वी कर्नाटक सरकारच्या कोर्टाकडून समन्स आले होते. ते सुद्धा पूर्ण करण्याचे धाडस संजय राऊतांकडे नाही. न्यायालयाचे कवच असतानाही ते कर्नाटकात जायला घाबरले. ते केवढे मोठे षंढ आहेत, असे म्हणत राऊतांच्या टीकेला शंभूराज देसाईंनी उत्तर दिले आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.