Shimla Agreement : हिमाचल राजभवनातून पाकिस्तानचा झेंडा हटवला ; फोटो आले समोर

Shimla Agreement : हिमाचल राजभवनातून पाकिस्तानचा झेंडा हटवला ; फोटो आले समोर

92
Shimla Agreement : हिमाचल राजभवनातून पाकिस्तानचा झेंडा हटवला ; फोटो आले समोर
Shimla Agreement : हिमाचल राजभवनातून पाकिस्तानचा झेंडा हटवला ; फोटो आले समोर

हिमाचलच्या राजभवनात शिमला कराराच्या (Shimla Agreement) ऐतिहासिक टेबलावर लावलेला पाकिस्तानचा झेंडा काढून टाकण्यात आला आहे. हा झेंडा ५३ वर्षे फडकत होता. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तो हटवल्याचे फोटो समोर आले आहेत. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने शिमला करार रद्द करण्याची घोषणाही केली आहे. (Shimla Agreement)

हेही वाचा-Amit Shah यांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन ; दिले महत्त्वाचे निर्देश

२ जुलै १९७२ रोजी भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारण्यासाठी शिमला करारावर स्वाक्षरी करण्यात आली. तेव्हा ही इमारत बार्न्स कोर्ट म्हणून ओळखली जात होती, आता हिमाचलचे राजभवन त्यात कार्यरत आहे. येथे भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष झुल्फिकार अली भुट्टो यांनी शिमला करारावर स्वाक्षरी केली होती. (Shimla Agreement)

हेही वाचा- Shirdi Airport वर दोन हेलिपॅड व आठ वाहनतळ उभारण्यास मान्यता; महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

ज्या दिवसापासून दोन्ही देशांमध्ये करार झाला, त्या दिवसापासून पाकिस्तानचा झेंडा येथे टेबलावर ठेवण्यात आला होता. राजभवनला भेट देणाऱ्यांना या ऐतिहासिक कराराची माहिती देता यावी, म्हणून ते स्मरणिका म्हणून स्थापित करण्यात आले होते. (Shimla Agreement)

काय आहे शिमला करार ? (Shimla Agreement)
शिमला कराराची पायाभरणी 1971 च्या भारत-पाक युद्धानंतर झाली होती. या युद्धात भारताने पाकिस्तानचा पूर्व भाग (आता बांगलादेश) स्वतंत्र केला होता आणि पाकिस्तानी सैन्याने शरणागती पत्करली होती. सुमारे 90 हजार पाकिस्तानी सैनिक भारताच्या ताब्यात होते. भारताने पश्चिम पाकिस्तानचा सुमारे 5 हजार चौरस मैलांचा भूभागही ताब्यात घेतला होता. या युद्धानंतर सुमारे 16 महिन्यांनी, 2 जुलै 1972 रोजी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांच्यात हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे हा ऐतिहासिक करार झाला. (Shimla Agreement)

शिमला करार हा खरंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सामान्य करण्यासाठी, भविष्यातील कोणताही वाद शांतता आणि संवादाद्वारे सोडवण्याची वचनबद्धता आहे. या करारात ठरले की भारत आणि पाकिस्तान आपले सर्व मुद्दे परस्पर चर्चेने सोडवतील. कोणत्याही तिसऱ्या देशाला किंवा संस्थेला यात हस्तक्षेपाची परवानगी दिली जाणार नाही. या कराराचा एक महत्त्वाचा मुद्दा असा होता की भारत आणि पाकिस्तान काश्मीरमधील नियंत्रण रेषा (LoC) एकमेकांच्या संमतीने मान्य करतील आणि कोणताही पक्ष एकतर्फीपणे ती बदलणार नाही. दोन्ही देशांनी हेही वचन दिले की ते एकमेकांविरुद्ध बळाचा वापर, युद्ध किंवा खोटा प्रचार करणार नाहीत. शांतता राखतील आणि संबंध सुधारतील. या करारांतर्गत भारताने 90 हजार पाकिस्तानी सैनिकांना कोणत्याही अटीशिवाय सोडले आणि ताब्यातील भूभागही सोडला. पाकिस्ताननेही काही भारतीय कैद्यांना सोडले. पण काही दशकांनंतर आज, जेव्हा भारताने दहशतवादी कारवायांबाबत पाकिस्तानला घेरले आहे आणि सिंधू जल करारासारखी पावले उचलली आहेत, तेव्हा पाकिस्तान उलट शिमला करारालाच हत्यार बनवत आहे. (Shimla Agreement)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.