जे ओवैसींना स्वीकारले, ते शरद पवारांना मात्र अमान्य; म्हणे, Pahalgam Terror Attack ला काही लोकांकडून धार्मिक विचार देण्याचा प्रयत्न

Pahalgam Terror Attack : काही लोक या परिस्थितीला धार्मिक विचार देण्याचा प्रयत्न करत आहेत, जे देशासाठी अतिशय धोकादायक आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले आहे.

92

पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे घडलेली घटना हा मोठा धक्का आहे. देशावर हल्ला होतो, तेव्हा मतभिन्नता नसते. काही लोक या परिस्थितीला धार्मिक विचार देण्याचा प्रयत्न करत आहेत, जे देशासाठी अतिशय धोकादायक आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले आहे. समाजवादी नेते रावसाहेब पवार (Raosaheb Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

(हेही वाचा – Maharashtra Weather : राज्यात वातावरणात मोठे बदल ; एकीकडे उष्णतेचा ऑरेंज अलर्ट, दुसरीकडे गारपीटचा अंदाज)

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून २६ पर्यटकांची हत्या केली. यानंतर देशभर संतापाची लाट उसळली आहे. अनेक पर्यटक वृत्तवाहिन्यांसमोर येऊन दहशतवाद्यांनी विचारलेले प्रश्न आणि कलमा येत नसल्याने केलेल्या हत्या यांविषयी बोलत आहेत. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनीही दहशतवाद्यांनी धर्म विचारून केलेल्या हत्यांविषयी संताप व्यक्त केला आहे. (Target killing) असे असूनही शरद पवार यांनी मात्र धर्माच्या नावाखाली हत्या केल्याचे अमान्य केले आहे.

देशाच्या ऐक्यात तडजोड नाही

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीचा उल्लेख करत शरद पवारांनी सांगितले की, त्या बैठकीत काही कमतरता आमच्याकडून झाल्या, हे नेतृत्वाने मान्य केले. पण आज देश संकटात असताना त्या कमतरतांवर चर्चा करण्याची वेळ नाही. काही लोक या परिस्थितीला धार्मिक विचार देण्याचा प्रयत्न करत आहेत, जे देशासाठी अतिशय धोकादायक आहे. देशाच्या एकतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करता येणार नाही, जेव्हा निवडणूक होईल तेव्हा बघू, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. (Pahalgam Terror Attack)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.