मिठी नदी घोटाळ्यात आदित्य ठाकरे ‘मिठीत’ का? डिनो मोरियासह चौकशीची Sanjay Nirupam यांची जोरदार मागणी

73
मिठी नदी घोटाळ्यात आदित्य ठाकरे 'मिठीत' का? डिनो मोरियासह चौकशीची Sanjay Nirupam यांची जोरदार मागणी
  • प्रतिनिधी

“मिठी नदीची सफाई झालीच नाही, पण निधी गेला कुठे?” असा थेट सवाल उपस्थित करत शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी अभिनेता डिनो मोरिया आणि शिवसेना उबाठा युवानेते आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तब्बल ६५ कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर, या दोघांची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

सफाईच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांची ‘साफसफाई’?

निरुपम (Sanjay Nirupam) म्हणाले की, मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी मागील दोन दशकांत १२०० कोटी रुपये खर्च झाले असतानाही, ही नदी आजही दूषित आणि गाळाने भरलेली आहे. याचा अर्थ असा की, निधी वापरण्याच्या नावाखाली मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे.

या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन राज्य सरकारने विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले असून, पालिकेचे तीन अधिकारी, पाच कंत्राटदार, तीन दलाल आणि दोन कंपन्यांची आर्थिक गुन्हे शाखा चौकशी करत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

(हेही वाचा – Mumbai Rain Update : मुंबईसाठी ऑरेज अलर्ट जारी; हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो ? वाचा)

डिनो मोरियासह आदित्य ठाकरेंचीही चौकशी हवी!

निरुपम (Sanjay Nirupam) म्हणाले, “डिनो मोरिया हा फक्त मिठी नदी सफाई प्रकरणातच नव्हे, तर ड्रग्ज रॅकेटसारख्या गंभीर प्रकरणातही चर्चेत आहे. त्याची आणि आदित्य ठाकरेंची जवळीक सर्वश्रुत आहे. तसेच, दिशा सालियन मृत्यू प्रकरणातही तिच्या वडिलांनी आदित्य ठाकरे आणि डिनो मोरियावर गंभीर आरोप केले होते. म्हणून या प्रकरणाची सखोल आणि स्वतंत्र चौकशी आवश्यक आहे.”

‘मातोश्री’च्या परवानगीशिवाय कंत्राट मिळायचे नाही!

२००५ ते २०२२ दरम्यान मुंबई महापालिकेत शिवसेना उबाठाचे वर्चस्व होते. त्या काळात ‘मातोश्री’च्या परवानगीशिवाय कोणालाही कंत्राट मिळत नसे, असेही गंभीर विधान निरुपम (Sanjay Nirupam) यांनी केले. त्यामुळे घोटाळ्याची मुळे कुठे आहेत हे शोधणे आता अधिक महत्त्वाचे ठरत आहे.

(हेही वाचा – Odisha मध्ये स्फोटकांनी भरलेला ट्रक नक्षलवाद्यांनी पळवला, चालकाला ठेवले ओलीस)

२६ जुलैचा पुनर्विचार आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचे सक्रिय नेतृत्व

२६ जुलै २००५ रोजी मुंबईला आलेल्या महापूराची आठवण करून देत, संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी ठाकरे कुटुंबावर हल्लाबोल केला. “त्या संकटाच्या वेळी उद्धव ठाकरे कुटुंबासह ताज हॉटेलमध्ये तर बाळासाहेब मातोश्रीवर सुरक्षित होते,” असा आरोप त्यांनी केला.

त्याच्या तुलनेत, अलीकडील अतिवृष्टीच्या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तात्काळ रस्त्यावर उतरले, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला भेट दिली आणि मुंबईकरांसाठी कार्यरत राहिले, हे सांगताना त्यांनी शिंदेंच्या तत्परतेचे कौतुक केले.

(हेही वाचा – Suicide : स्किझोफ्रेनिया ग्रस्त तरुणीची २३ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या)

संजय राऊतांवरही बाण

नुकत्याच ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भातील विधानांवरून खासदार संजय राऊतांनाही धारेवर धरत, निरुपम (Sanjay Nirupam) म्हणाले, “राऊत पाकिस्तानची सुपारी घेऊन बोलत आहेत काय?” जगभरात भारतीय संसद सदस्य ज्या कारवाईचे कौतुक करत आहेत, त्याची खिल्ली उडवणे हे अत्यंत गंभीर असून, राऊत पाकिस्तानची भाषा बोलत आहेत, असे त्यांनी ठणकावले.

सत्य बाहेर यायलाच हवे

ही प्रकरणं केवळ राजकीय टीका-टिप्पणीपुरती मर्यादित नाहीत, तर मुंबईकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहेत. त्यामुळे या प्रकरणांची निष्पक्ष आणि सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी ठाम भूमिका संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी मांडली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.