समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार ; CM Devendra Fadnavis यांची माहिती

समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार ; CM Devendra Fadnavis यांची माहिती

67
समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार ; CM Devendra Fadnavis यांची माहिती
समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार ; CM Devendra Fadnavis यांची माहिती

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे येत्या काळात या महामार्गाला वाढवण बंदराशी जोडण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केले.

हेही वाचा-Corona Update : पुण्यात गेल्या २४ तासांत करोनाच्या रूग्णसंख्येत लक्ष्यणीय वाढ !

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण व सायन पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्रमांक तीन दक्षिण वाहिनीचा लोकार्पण सोहळा दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, समृद्धी महामार्गासाठी विक्रमी वेळेत भूसंपादन करण्यात आले आहे. या मार्गामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील २४ जिल्हे जेएनपीटी बंदराशी जोडले गेले आहेत, आता हा महामार्ग वाढवण बंदराशी जोडला जाईल. ७०१ किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी ५५ हजार ३३५ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. (CM Devendra Fadnavis)

हेही वाचा- Pakistan Spy Jasbir Singh च्या फोनमध्ये सापडले 150 पाकिस्तानी नंबर ; लाहोरमध्ये ज्योतीसोबत खरेदी … Video Viral

समृद्धी महामार्गाचा 76 किलोमीटर मार्ग नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातून जातो. या भागात सह्याद्रीच्या डोंगर रांगा असून अतिशय खडतर भौगोलिक परिस्थितीत मार्ग काढत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हे अभियांत्रिकी आव्हान पेलले असं फडणवीस म्हणाले. यातील इगतपुरीजवळील बोगदा हा 8 किलोमीटर लांबीचा असून तो राज्यातील सर्वाधिक लांबीचा आणि देशातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा आहे. (CM Devendra Fadnavis)

हेही वाचा- India Tour of England : पहिल्या कसोटी सामन्याकरिता इंग्लंडचा संघ जाहीर; कुणा-कुणाचा संघात समावेश?

समृद्धी महामार्गासह पालखी मार्गावर वन विभागाच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला आहे. या महामार्गामुळे एक हजार शेततळी तयार झाली आहेत. याबरोबरच दर 500 मीटरवर जलपुनर्भरण व्यवस्था करण्यात आली आहे. या महामार्गालगत सौर ऊर्जा निर्मिती करण्यात येणार आहे. त्यापैकी 35 मेगावॉट प्रकल्पाचे काम सुरू आहे. महामार्गालगत गेल कंपनीतर्फे गॅस वाहिनी टाकण्यात आली आहे. या माध्यमातून नव्याने विकसित होणाऱ्या स्टीलसिटी गडचिरोली पर्यंत गॅस पोहोचविता येईल. तसेच धार्मिक आणि पर्यटनस्थळे या मार्गामुळे जोडली आहेत. (CM Devendra Fadnavis)

हेही वाचा- शाळेची फी न भरल्याबद्दल ३१ विद्यार्थ्यांना केलं निलंबित ; Delhi High Court ने शाळेला फटकारलं

दरम्यान वाशी खाडीवरील तिसऱ्या पुलामुळे वाहतूक सुलभ होण्यास मदत होईल,असेही फडणवीस यावेळी म्हणाले. यापुलाचे ही लोकार्पण करण्यात आले. महामार्ग अपघातमुक्त करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या महामार्गामुळे वन्यजीवांच्या संचारात अडथळे येऊ नयेत म्हणून 100 प्रकारच्या संरचना तयार करण्यात आल्या आहेत. देशात अशा प्रकारची रचना प्रथमच साकारण्यात आली आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांचा संचार विना व्यत्यय सुरू आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. आगामी काळात शक्तिपीठ महामार्ग साकारण्यात येणार आहे. या महामार्गामुळे मराठवाड्यातील आर्थिक चित्र बदलण्यास मदत होईल असं ही ते म्हणाले. (CM Devendra Fadnavis)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.