रामदास आठवलेंच्या वक्तव्याने खळबळ; म्हणाले, “मनसेच्या युतीची गरज…”

158

गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट, भाजप आणि मनसे यांच्यातील भेटी गाठी वाढत असून त्यांच्यात जवळीक निर्माण होत असल्याच्या चर्चा सुरू आहे. शिवतीर्थावर झालेल्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमात एकाच मंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तिघेही एकत्र उपस्थित होते.

यामुळे नवी युती पहायाला मिळेल अशा चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच मनसेचे आमदार राजू पाटील यांनी या चर्चेला खतपाणी घालणारे विधान केले तर केंद्रीय रामदास आठवले यांनी मनसेच्या महायुतीबाबत खळबळजनक वक्तव्य केल्याचे समोर आले आहे.

(हेही वाचा – केतकी पुन्हा भडकली; म्हणाली, “… आणि धर्माची माती करु नका”)

काय म्हणाले आठवले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंच्या कार्यक्रमाला गेले असले तरी मनसे, राज ठाकरे एनडीए मध्ये येणार नाही, असे रामदास आठवले म्हणाले आहेत. तर आम्हाला तशी मनसेची आवश्यकता नाही, मुंबई महापालिकेवर आरपीआय, भाजप आणि शिंदे गटाचाच झेंडा फडकणार आहे. त्यामुळे राज ठाकरेंची आमच्या महायुतीत गरज नाही, असेही आठवले म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.