Rahul Gandhi यांनी परदेशात जाऊन पुन्हा केली भारताची बदनामी; भाजपा म्हणते, जॉर्ज सोरोसचे एजंट

602
Rahul Gandhi यांनी परदेशात जाऊन पुन्हा केली भारताची बदनामी; भाजपा म्हणते, जॉर्ज सोरोसचे एजंट
Rahul Gandhi यांनी परदेशात जाऊन पुन्हा केली भारताची बदनामी; भाजपा म्हणते, जॉर्ज सोरोसचे एजंट
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन भारतातील निवडणूक आयोगाबाबत वादग्रस्त विधान केले आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) पक्षपातीपणा केल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सध्या कॉंग्रेस खासदार राहुल गांधी हे २ दिवसांसाठी अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. (Rahul Gandhi)
दरम्यान, अमेरिकेतील ब्राउन विद्यापीठात (Brown University) एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी परदेशात भारताचा हा अंतर्गत मुद्दा उपस्थित केला. देशाच्या निवडणूक व्यवस्थेत एक ‘मोठी समस्या’ आहे. “सोप्या शब्दात सांगायचे तर, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदान करणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रातील प्रौढांपेक्षा जास्त आहे आणि मी हे एका वस्तुस्थितीच्या आधारे सांगत आहे.” असे विधान राहुल गांधी यांनी केले.
(हेही वाचा – पुण्यातील Tanisha Bhise प्रकरणात सरकार आक्रमक; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाईची कुर्‍हाड)
राहुल गांधी यांचा दावा… 
“संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत मतदानाची आकडेवारी उपलब्ध होती, परंतु ५:३० ते ७:३० वाजेपर्यंत, जेव्हा मतदान संपायला हवे होते, त्यावेळी ६५ लाख मते स्वतंत्रपणे टाकण्यात आली.” राहुल गांधींनी ते व्यावहारिकदृष्ट्या अशक्य असल्याचे म्हटले आहे. “एखाद्या व्यक्तीला मतदान करण्यासाठी सुमारे ३ मिनिटे लागतात, जर आपण गणित केले तर याचा अर्थ असा की लोक पहाटे २ वाजेपर्यंत मतदान करण्यासाठी रांगेत उभे असले पाहिजे होते आणि हे मतदान रात्रभर सुरू राहिले पाहिजे होते. मात्र असे कोणतेही चित्र नव्हते” असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिल्यानंतरही राहुल गांधी निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्याचा मुद्दा उपस्थित करत आहेत.

राहुल गांधींच्या या विधानावर भाजपा (BJP) आक्रमक झाली आहे. त्यांच्या भारतविरोधी विधानावर टीका करताना भाजपा प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) लिहिले की, “स्वतःच्या देशातील मतदारांचा विश्वास जिंकू न शकणारे राहुल गांधी परदेशात जाऊन भारतीय लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.”

(हेही वाचा – Muslim : कर्नाटकात ३० वर्षांत मुसलमानांची लोकसंख्या ३९ लाखांवरून ७७ लाख वाढली; हिंदूंची संख्या किती वाढली?)
भाजपा प्रवक्ते प्रदीप भंडारी (Pradeep Bhandari) यांनी राहुल गांधींना ‘लोकशाहीविरोधी’ आणि ‘भारतविरोधी’ म्हटले आहे. तसेच राहुल गांधी हे जॉर्ज सोरोसचे एजंट आहेत, जे नेहमीच देशाची बदनामी करतात आणि परदेशात विष ओकतात. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत आणि इथल्या संस्थांबद्दल परदेशात वादग्रस्त विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, सप्टेंबर २०२४ मध्ये त्यांच्या अमेरिका भेटीदरम्यान, त्यांनी भारतीय लोकशाहीबद्दल अशाच अनेक गोष्टी बोलल्या होत्या.या दरम्यान त्यांनी भारताची तुलना सीरिया आणि इराकशी केली होती. 
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.