Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन भारतातील निवडणूक आयोगाबाबत वादग्रस्त विधान केले आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) पक्षपातीपणा केल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सध्या कॉंग्रेस खासदार राहुल गांधी हे २ दिवसांसाठी अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. (Rahul Gandhi)
दरम्यान, अमेरिकेतील ब्राउन विद्यापीठात (Brown University) एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी परदेशात भारताचा हा अंतर्गत मुद्दा उपस्थित केला. देशाच्या निवडणूक व्यवस्थेत एक ‘मोठी समस्या’ आहे. “सोप्या शब्दात सांगायचे तर, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदान करणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रातील प्रौढांपेक्षा जास्त आहे आणि मी हे एका वस्तुस्थितीच्या आधारे सांगत आहे.” असे विधान राहुल गांधी यांनी केले.
(हेही वाचा – पुण्यातील Tanisha Bhise प्रकरणात सरकार आक्रमक; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाईची कुर्हाड)
राहुल गांधी यांचा दावा…
“संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत मतदानाची आकडेवारी उपलब्ध होती, परंतु ५:३० ते ७:३० वाजेपर्यंत, जेव्हा मतदान संपायला हवे होते, त्यावेळी ६५ लाख मते स्वतंत्रपणे टाकण्यात आली.” राहुल गांधींनी ते व्यावहारिकदृष्ट्या अशक्य असल्याचे म्हटले आहे. “एखाद्या व्यक्तीला मतदान करण्यासाठी सुमारे ३ मिनिटे लागतात, जर आपण गणित केले तर याचा अर्थ असा की लोक पहाटे २ वाजेपर्यंत मतदान करण्यासाठी रांगेत उभे असले पाहिजे होते आणि हे मतदान रात्रभर सुरू राहिले पाहिजे होते. मात्र असे कोणतेही चित्र नव्हते” असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिल्यानंतरही राहुल गांधी निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्याचा मुद्दा उपस्थित करत आहेत.
Anti Democracy, Anti India Rahul Gandhi who could not win the trust of Indian electorate begins to question Indian democratic process on a foreign soil.
Why does Rahul always defame India on a foreign soil?
An agent of George Soros who is Fighting Indian state – that’s what… pic.twitter.com/jzN7ihOYV8
— Pradeep Bhandari(प्रदीप भंडारी)🇮🇳 (@pradip103) April 21, 2025
राहुल गांधींच्या या विधानावर भाजपा (BJP) आक्रमक झाली आहे. त्यांच्या भारतविरोधी विधानावर टीका करताना भाजपा प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) लिहिले की, “स्वतःच्या देशातील मतदारांचा विश्वास जिंकू न शकणारे राहुल गांधी परदेशात जाऊन भारतीय लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.”