महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत खोटे दावे केलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधीं(Rahul Gandhi)ना भाजपाने पुन्हा एकदा फटकारले. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राहुल गांधीं(Rahul Gandhi)ना खोचक टोला लगावला आहे. राहुल गांधी यांचे बोलणे त्यांच्याच पक्षातील नेते गांभीर्याने घेत नाहीत, मग इतरांनी कशाला घ्यावे?, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फटकारले.(Rahul Gandhi)
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने ‘मॅचफिक्सिंग’ केल्याचा खोटा आरोप राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी वृत्तपत्रात लेख लिहित केला होता. त्यानंतर पु्न्हा मोदी सरकारच्या ११ वर्षेपूर्तीला केवळ स्वप्ने दाखवून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधीं(Rahul Gandhi)ना भाजपने चोख प्रत्युत्तर दिले आहे. नागपुरातील एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री गडकरींनी भाजपाच्या मागील ११ वर्षांच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला.
(हेही वाचा आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालात ‘Indian Social Security’चं वास्तव काय?; वाचा संपूर्ण बातमी )
गडकरी म्हणाले, काँग्रेसच्या ६० वर्षांच्या कार्यकाळात जे होऊ शकले नाही, ते आम्ही ११ वर्षांत करून दाखविले. देशभरात रस्त्यांचे जाळे, उड्डाणपूल व पायाभूत सुविधांमुळे लॉजिस्टिक खर्च १० टक्क्यांवर आल्याचेही ते म्हणाले. तसेच, आयआयएम बंगळुरू, आयआयटी चेन्नई व कानपूर यांच्या अभ्यासातून लॉजिस्टिक खर्च कमी झाल्याचेही त्यांनी सांगितले.
डिसेंबरपर्यंत हा खर्च ९ टक्क्यांवर आणण्याचे आमचे उद्दिष्ट आहे असे सांगतानाच केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, आम्ही स्वप्ने दाखवत नाही, तर प्रत्यक्ष कामाची माहिती देतो. भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर असून सर्व आकडेवारी उपलब्ध आहे, ती विरोधकांनी तपासावी. तसेच, २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्नही आम्ही पूर्ण करू, असा विश्वासही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी व्यक्त केला.(Rahul Gandhi)
Join Our WhatsApp Community