Pahalgam Terror Attack : ‘कठोर आणि निर्णायक कारवाईकरिता भारत वचनबध्द’, पंतप्रधानांचा पुनरुच्चार

पहलगाम दहशतवादी हल्ल्या(Pahalgam Terror Attack)नंतर भारत-पाकिस्तान संबंध ताणले गेले असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा पाकिस्तानला इशारा दिला.

54

पहलगाम दहशतवादी हल्ल्या(Pahalgam Terror Attack)नंतर भारत-पाकिस्तान संबंध ताणले गेले असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा पाकिस्तानला इशारा दिला. दहशतवाद्यांवर आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांविरुद्ध ठोस आणि निर्णायक कारवाई करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अंगोलाचे राष्ट्रपती लॉरेन्को यांच्यात द्विपक्षीय चर्चा आज झाली. त्यानंतर बोलताना पंतप्रधान म्हणाले सीमापार दहशतवादाविरुद्धच्या आमच्या लढाईत अंगोलाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल भारताने अंगोलाचे आभार मानले.

(हेही वाचा  Earthquake : जम्मू- काश्मीर आणि गुजरातमध्ये भूकंपाचे धक्के ! )

पंतप्रधान पुढे म्हणाले, दहशतवाद हा मानवतेसाठी सर्वात मोठा धोका आहे यावर आमचे एकच मत आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल राष्ट्रपती लॉरेन्को आणि अंगोलाने दिलेल्या शोकसंवेदनांबद्दल पंतप्रधानांनी आभार मानले. दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अंगोलाचे राष्ट्रपती लॉरेन्को यांच्यात द्विपक्षीय बैठक घेतली.२२ एप्रिलला झालेल्या पहलगाम बैसरन खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्या(Pahalgam Terror Attack)नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून तातडीने भारतात दाखल झाले.

सौदीहून परतताच पंतप्रधानांनी विमानतळावरच तातडीची बैठक घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यासोबतच सुरक्षा समितीच्या कॅबिनेट बैठकीत दहशतवादाविरोधात केंद्र सरकार कठोर भूमिका घेईल याबाबत स्पष्ट संकेत मिळाले. आज द्विपक्षीय बैठकीत पंतप्रधानांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला ठणकावून सांगितले. दहशतवाद आणि त्याला पाठिंबा देणाऱ्यांविरोधात कठोर आणि निर्णायक कारवाई करण्यास भारत वचनबध्द असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधान मोदींनी केला.(Pahalgam Terror Attack)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.