
-
प्रतिनिधी
“आरोप करण्यापेक्षा काम करा, जनता तुमच्या मागे उभी राहील!” असा थेट सल्ला देत उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर परखड शब्दांत निशाणा साधला. “घरात बसणाऱ्यांची नाही, तर काम करणाऱ्यांची जनता साथ देते,” असे म्हणत त्यांनी शिवसेना उबाठाला लक्ष्य केले.
नाशिकमधील मुक्तागिरी शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या पक्षप्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री शिंदे (Ekanth Shinde) यांनी जोरदार राजकीय शक्तिप्रदर्शन केले. शिवसेना उबाठाचे चार नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेतला. यामध्ये युवती सेनेच्या उपजिल्हा प्रमुख किरण बाळा दराडे, महिला बालकल्याण सभापती सीमा नगळ, माजी सभापती पुंडलिक अरिंगळे आणि माजी नगरसेवक पुनजाराम गामणे यांचा समावेश होता.
(हेही वाचा – Iran-Israel War : इस्त्रायली पंतप्रधान नेत्यानाहू यांचं ठरलं; म्हणाले, ‘खोमेनींना थेट लक्ष्य केल्याने…’)
कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे (Ekanth Shinde) म्हणाले, “२०२२ मध्ये आम्ही जनतेच्या मनातलं सरकार आणलं. त्यांनी फक्त आरोप केले, आम्ही काम करून दाखवलं. त्यामुळेच आज लोक काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे आहेत.” त्यांनी उपस्थित नगरसेवकांचं स्वागत करत म्हटलं, “तुमचं चिन्ह आधीही धनुष्यबाण होतं, आजही तेच आहे. तुम्ही स्वगृही परतला आहात. शिवसेनेशी नाशिककरांचे नातं हे जिव्हाळ्याचं आहे. या पक्षप्रवेशामुळे नाशिकमध्ये शिवसेना अधिक बळकट होणार आहे.”
मंत्री दादा भुसे, खासदार नरेश म्हस्के, माजी खासदार हेमंत गोडसे, सचिव राम रेपाळे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आदी नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. उपमुख्यमंत्री शिंदे (Ekanth Shinde) यांनी पुढे सांगितले की, “मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्ष काम करत असताना आम्ही विकासकेंद्रित, लोकाभिमुख निर्णय घेतले. महायुतीने २३२ जागांवर विजय मिळवून ऐतिहासिक बहुमत मिळवले. राज्यात जनतेचा भरवसा शिवसेनेवर आहे कारण आम्ही दिलेला शब्द पाळतो.”
(हेही वाचा – राज्याच्या सागरी सुरक्षेसाठी ‘हाय स्पीड गस्ती नौका’ तैनात; Nitesh Rane यांची भाऊचा धक्का येथे पाहणी)
“आज शिवसेनेत येणारे सर्व जण तळागाळात काम करणारे आहेत. काम करणाऱ्यांना शिवसेनेवर विश्वास वाटतो, म्हणूनच दररोज वेगवेगळ्या पक्षांचे लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत,” असे स्पष्ट करत उपमुख्यमंत्री शिंदे (Ekanth Shinde) यांनी पक्ष बळकटीसाठीची रणनीती उघड केली.
राजकीय वर्तुळात खळबळ
या घडामोडींमुळे शिवसेना उबाठाच्या नाशिकमधील ताकदीला मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे. शिवसेनेच्या ‘घरवापसी’ धोरणामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये राजकीय गणिते बदलण्याची शक्यता आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community