Pahalgam Attack नंतर भारतात पाकिस्तानच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानामुळे हा दहशतवादी हल्ला (Pahalgam Attack) झाल्याचे सांगत पाकिस्तानवर कडक कारवाई करण्याची मागणी होवू लागली आहे. त्यातच आता पाकिस्तानच्या क्रिकेतपटूने पाकिस्तानी सरकारलाच घरचा अहेर दिला आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटू दानिश कानेरिया याने सरकारला सुनावले आहे.
(हेही वाचा Pahalagam Attack वरून पाकिस्तान खूश झाला आहे का? उच्चायुक्तालयात एक कर्मचारी केक घेऊन जाताना दिसला)
दानिश कानेरिया काय म्हणाला?
पहलगाम हल्ल्यात (Pahalgam Attack) पाकिस्तानचा खरोखरच काही सहभाग नसेल तर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अद्याप हल्ल्याचा निषेध का केला नाही? सैन्य अचानक ही अलर्टवर का आहे? कारण खोलवर, तुम्हाला सत्य माहीत आहे. तुम्ही दहशतवाद्यांना आश्रय देत आहात आणि त्यांचे पालनपोषण करत आहात. तुम्हाला लाज वाटली पाहिजे, असे पाकिस्तानी क्रिकेटपटू दानिश कानेरिया म्हणाला. (Pahalgam Attack)
Join Our WhatsApp Community