भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर भैसाटलेल्या पाकड्यांनी (Pakistan) सीमेवरून भारताच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरू केला, तोफ गोळे डागले, त्यानंतर भारताने तातडीने प्रत्युत्तरा दाखल सैनिकी कारवाई करून लाहोर, कराची आणि रावळपिंडी येथील हवाई सुरक्षा यंत्रणा उद्ध्वस्त केली. भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तान (Pakistan) प्रचंड घाबरला आहे. पाकिस्तानच्या संसदेच्या विशेष सत्रामध्ये तर एक खासदार चक्क रडला आणि अल्ला आम्हाला वाचव असे म्हणू लागला.
पाकिस्तानी (Pakistan) संसदेत चर्चेदरम्यान, खासदार आणि माजी पाकिस्तानी मेजर ताहिर इक्बाल अक्षरशः रडले. इक्बाल म्हणाला, मी प्रार्थना करतो की अल्लाह आमचे रक्षण करो, आमच्या देशाचे रक्षण करावे. जगभरात मुसलमानांच्या पाठीमागे काय संकटे येत आहेत. तिकडे पॅलेस्टाईन इथे पाकिस्तानात (Pakistan) मुसलमान संकटात आहेत. आम्ही गुन्हेगार असलो तरी अल्ला तुझ्या दरबारात दया आहे, आम्हा सर्वांचे रक्षण कर, असे खासदार इक्बाल म्हणाले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे पाकिस्तानला (Pakistan) त्यांच्या नापाक कारवायांसाठी धडा शिकवला आहे. यानंतर, पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा एक वाईट आणि अयशस्वी प्रयत्न केला. भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये रस्त्यांपासून संसदेपर्यंत भीतीचे वातावरण आहे.
Join Our WhatsApp Community