भारताच्या लष्कराला Pakistan घाबरला; नागरिकांना अन्न, औषधे, जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्याचे आवाहन

64
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारतासोबत संघर्ष होण्याची भीती असल्याने पाकिस्तानने (Pakistan) पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) रहिवाशांना अन्न, औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्याचे आदेश दिले आहेत.
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने (Pakistan) सीमेवर सलग आठ वेळा गोळीबार केला आहे. भारताने आपल्या लष्कराला पूर्ण ऑपरेशनला स्वातंत्र्य दिल्यानंतर, पाकिस्तानातून आता दावे करण्यात येत आहेत की, भारत त्यांच्यावर हल्ला करणार असल्याची गुप्तचर माहिती त्यांच्याकडे आहे. तणाव वाढत असताना दोन्ही देशांनी त्यांच्या राजदूतांना परत बोलावले असून, सीमा बंद केल्या आहेत. पीओकेचे पंतप्रधान चौधरी अन्वरुल हक यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर जारी केलेल्या आदेशानुसार, नियंत्रण रेषेजवळ राहणाऱ्या रहिवाशांना अन्न आणि आवश्यक वस्तूंचा साठा करण्यास सांगितले आहे. तसेच, नीलम व्हॅली आणि नियंत्रण रेषेच्या इतर लगतच्या भागात पर्यटकांचा प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तसेच जाहीर केलेल्या अनेक उपाययोजनांमध्ये पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमधील धार्मिक मदरसे बंद करणे, तसेच लष्करी संघर्ष झाल्यास करावयाच्या मदत उपाययोजनांना पाठिंबा देण्यासाठी १ अब्ज रुपयांचा आपत्कालीन प्रतिसाद निधी स्थापन करणे यांचा समावेश होता. (Pakistan)
याव्यतिरिक्त, नीलम, झेलम, पूंछ, हवेली, कोटली आणि भिंबर यासारख्या प्रमुख नियंत्रण रेषेतील मतदारसंघांमध्ये रस्ते खुले राहावेत यासाठी अधिकृत आणि खाजगी यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. पीओकेमधील नागरी संरक्षण दलांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे, तर स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने रहिवाशांना कोणत्याही तातडीच्या मदतीची आवश्यकता असल्यास आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक ११२२ देखील जारी केली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.