
पहलगाममधील हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत सरकारने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. यावेळी भारताने पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी याआधी कधीही न घेतलेले निर्णय घेतले आहेत. भारताने 1960 सालचा ऐतिहासिक असा सिंधू जलवाटप करार स्थगित केला आहे. या मोठ्या निर्णयासह भारताने इतरही काही महत्त्वाचे निर्णय घेतला आहेत. दरम्यान, सरकारच्या या निर्णयानंतर 24 एप्रिल रोजी दिल्लीमध्ये एक सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत सरकारने विरोधकांना पहलगाम हल्ल्यानंरच्या भारताच्या भूमिकेची आणि पहलगाममधील सद्यस्थितीची माहिती दिली. (Pahalgam Terror Attack)
#WATCH | Delhi: After the all-party meeting, Union Minister Kiren Rijiju says, “The meeting went very well, and in fact, all the political leaders unanimously supported the action taken by the Cabinet Committee on Security (CCS) with regard to Pakistan. The Government made it… pic.twitter.com/6zdywpSoct
— ANI (@ANI) April 24, 2025
या बैठकीत काय घडलं या संदर्भातील माहिती केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी माध्यमांना दिली. किरेन रिजिजू यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर माहिती देताना म्हटलं की, “गेल्या काही वर्षांपासून काश्मीरमध्ये शांततेत लोक व्यापार करत होते, पर्यटक येत होते, सर्व चांगलं सुरु होतं. या घटनेमुळं वातावरण बिघडलं यावर सर्वांनी चिंता व्यक्त केली. सर्व राजकीय पक्षांनी त्यांचे विचार मांडले. दहशतवादाविरुद्ध भारताला एकजूट होऊन लढाई लढावी लागेल, हे सर्वांनी मान्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये जे भाषण केलं ते सर्वांनी ऐकलं आहे. भारत दहशतवादावर कठोर प्रहार करण्यात आला तो यापुढं देखील केला जाईल.” (Pahalgam Terror Attack)
#WATCH | Delhi: After the all-party meeting, Union Minister Kiren Rijiju says, “The Defence Minister informed about the incident that happened in Pahalgam and the actions taken by the Indian government in the CCS meeting. This incident is very sad. Due to which everyone in the… pic.twitter.com/0XiTnv3kOV
— ANI (@ANI) April 24, 2025
दहशतवादाविरोधातील लढाईत सर्व राजकीय पक्ष सोबत आहेत. सरकार जे पावलं उचलेल त्यांच्या सोबत असेल, असं राजकीय पक्षांनी सांगितल्याचं किरेन रिजिजू म्हणाले. ही बैठक सकारात्मकतेनं संपली. दहशतवादाविरुद्ध एकजुटीनं लढाई लढायची, हे यापुढं देखील कायम राहील. अशा घटनांच्या काळात एकमेकांकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये, राजकारण करु नये, असं आवाहन केल्याचं रिजिजू यांनी सांगितलं. या वातावरणात देश एकजूट राहिला पाहिजे हा संदेश दिला आहे. (Pahalgam Terror Attack)
#WATCH | Delhi | Union Home Minister Amit Shah, Defence Minister Rajnath Singh, Union Minister and BJP national president JP Nadda, Union Minister Kiren Rijiju leave from the Parliament Annexe building after attending the all-party meeting.#PahalgamTerroristAttack pic.twitter.com/IOujeLNLdh
— ANI (@ANI) April 24, 2025
दहशतवादाविरूद्धच्या लढाईत आपण यशस्वी होऊ, पाकिस्तान आणि ज्यांनी कुणी ही घटना घडवली आहे त्यांचा बदला घेणार आहोत. यासाठी एकजूट राहू आम्ही हे मानतो, असं किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. (Pahalgam Terror Attack)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community