Pahalgam Attack वर काँग्रेस नेते सैफुद्दीन सोझ यांचे देशद्रोही वक्तव्य; म्हणाले, पाकिस्तानचे म्हणणे मान्य करा

केंद्रीय मंत्री सैफुद्दीन सोझ यांच्यासारखे लोक, जे काँग्रेसचा खरा चेहरा मांडतात, ते सरकारच्या निर्णयावर नाराज आहेत, अशी टीका भाजपाने केली आहे.

704
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत (Pahalgam Attack) माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते सैफुद्दीन सोझ यांचे वादग्रस्त विधान समोर आले आहे. त्यांनी ही घटना दुःखद आणि अस्वीकार्य असल्याचे वर्णन केले. भारत आणि पाकिस्तान हे शेजारी आहेत आणि दोन्ही देशांमधील संवादाशिवाय दुसरे काहीही शक्य नाही. जर पाकिस्तान म्हणत असेल की त्यांचा यात सहभाग नाही, तर आपण सध्या तो युक्तिवाद स्वीकारला पाहिजे. भारत आणि पाकिस्तानमध्ये जे काही होईल ते फक्त संवादातूनच होईल. संभाषण आणि चर्चा. लष्करी उपाय नाही, शस्त्रे नाहीत, तलवारी नाहीत. तोंडी संवादाशिवाय दुसरे काहीही चालणार नाही, असे अकलेचे तारे त्यांनी तोडले.
भाजप खासदार अनुराग ठाकूर म्हणाले, ‘नरेंद्र मोदी सरकारने सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा शहाणपणाचा निर्णय घेतला आहे, जो पाकिस्तानला स्पष्ट संदेश देतो की, जेव्हा तुम्ही शत्रुत्व दाखवता तेव्हा आदरातिथ्याची अपेक्षा करू नका. ‘पाकिस्तान आणि त्याच्या दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी मोदी सरकारने अत्यंत संयमाने उचललेल्या राजनैतिक पावलांना संपूर्ण देशाने निःसंशयपणे पाठिंबा दिला आहे. तथापि, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारमधील माजी केंद्रीय मंत्री सैफुद्दीन सोझ यांच्यासारखे लोक, जे काँग्रेसचा खरा चेहरा मांडतात, ते सरकारच्या निर्णयावर नाराज आहेत. जर पाकिस्तानने असे हल्ले सुरू ठेवले तर भारत एक थेंबही पाणी देणार नाही, असे भाजप खासदाराने आवर्जून सांगितले. पाकिस्तान आणि त्यांच्या मित्रांना हे स्पष्ट करायला हवे की जर तुम्ही आमच्या रक्ताचा एक थेंबही सांडला तर भारत आम्हाला एक थेंबही पाणी देणार नाही, असे ठाकूर यांनी ट्विटरवर म्हटले आहे. (Pahalgam Attack)

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.