केंद्रातील एनडीए सरकारमधील घटक पक्ष असणाऱ्या तेलुगु देसम पार्टी(टीडीपी)चे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor)ला पाठिंबा दिला. ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor)च्या यशाबाबबत चंद्रबाबू नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. नायडू म्हणाले, २० मिनिटांच्या आता भारताने दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केले. यादरम्यान पाकिस्तानातील नागरिकांवर व संरक्षण संस्थांवर कुठलाही हल्ला झाला नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.(Operation Sindoor)
(हेही वाचा ‘मी दिल्लीत राहतो, पण माझे कान तामिळनाडूकडे आहेत’; केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांनी स्टॅलिन सरकारला डिवचलं )
ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor)अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर संघर्ष वेळीच थांबविण्यात आला असे सांगतानाच चंद्राबाबू नायडू म्हणाले, पंतप्रधान मोदी दोन्ही देशांतील युध्द थांबविण्यात यशस्वी झाले असून जर का संघर्ष जास्त काळ चालू राहिला असता तर आपले नुकसान झाले असते, असेही यावेळी नायडू यांनी सांगितले. ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor)च्या नावाबाबत बोलताना ते म्हणाले, या माध्यमातून भारतीय महिलांच्या भावनांचा आदर केला गेला.
(हेही वाचा आगामी विधानसभा निवडणुकांच्या पराभवाची आतापासूनच तयारी; CM Devendra Fadnavis यांचा राहुल गांधींना खोचक टोला )
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांची दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आली. यात विशेषतः पुरुषांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्यदलाने केलेल्या लष्करी कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले. यातून भारतीय महिलांच्या भावनांचा आदर करण्यात आला. म्हणूनच पंतप्रधान मोदींनी ऑपरेशनला ‘सिंदूर(Operation Sindoor)’ असे नाव दिले होते, असे नायडू म्हणाले.
वक्फ कायद्यावर चंद्राबाबू नायडू काय म्हणाले?
वक्फ कायद्याच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री नायडू म्हणाले की, वक्फ कायदा मुस्लिम समुदायाच्या बाजूने असून कायद्याचा उद्देश प्रशासन, पारदर्शकता आणि जबाबदारी सुधारणे आहे. ते म्हणाले, टीडीपी मुस्लिमांसह सर्व धर्म आणि समुदायांसाठी आहे. वक्फ मालमत्तांचा वापर अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी केला पाहिजे. जर त्याचा योग्य वापर केला गेला तर ते मुस्लिमांच्या हिताचे आहे, असेही नायडू यांनी स्पष्ट केले. आंध्र प्रदेशात राज्य सरकारने १३ जिल्ह्यांमध्ये उर्दूला दुसरी भाषा म्हणून घोषित केले होते. काँग्रेस आणि एआयएमआयएम सारख्या विरोधी पक्षांनी वक्फ कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे आणि ते असंवैधानिक आणि भेदभावपूर्ण असल्याचे चंद्राबाब नायडू यांनी सांगितले.
‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ला पाठिंबा
‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ या कल्पनेलाही नायडू यांनी पाठिंबा दिला. यातून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका दर पाच वर्षांनी एकाच वेळी घ्याव्यात. ते म्हणाले, आम्ही सुरुवातीपासूनच याला पाठिंबा देत आहोत. वारंवार निवडणुका घेणे लोकशाहीसाठी चांगले नसून निवडणुका संपल्यानंतर पुढील पाच वर्षे प्रशासनावर लक्ष केंद्रित करू शकतो. अलीकडेच महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये एकाच वर्षी दोन निवडणुका झाल्या. आता बिहारमध्येही निवडणुका होणार आहेत. आपल्याला काही निवडणूक सुधारणांची आवश्यकता आहे, अशी भूमिका चंद्राबाबू नायडू यांनी मांडली.(Operation Sindoor)
Join Our WhatsApp Community