Modi Government : ‘इंडिया फर्स्ट’ धोरणामुळेच नऊ वर्षांत देशात दहशतवादी हल्ला झाला नाही – अर्थमंत्री निर्मला सीतारामन

मोदी सरकारच्या नऊ वर्षांना आणखी उल्लेखनीय बनवणारी गोष्ट म्हणजे, कोविड काळातील भारताची भूमिका आणि युक्रेन युद्धातील रोखठोक भूमिका असे सीतारामन म्हणाल्या.

84
Indian Economy : जागतिक अनिश्चितता सहन करण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्था तयार

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात नवीकरणीय ऊर्जा क्षेत्र भारतासाठी सर्वात मोठे आधार असल्याचे अधोरेखित केले. त्या नऊ वर्षांत अक्षय्य ऊर्जा क्षेत्रात भारताने जेवढे यश मिळवले आहे, तेवढे जगातील कोणत्याही देशाने मिळवले नाही, असे त्यांनी आवर्जून सांगितले. दहशतवादाच्या मुद्द्यावर, त्या म्हणाल्या की, गेल्या नऊ वर्षांत काही सीमेवरील चकमकी वगळता देशावर कोणताही मोठा दहशतवादी हल्ला झालेला नाही. मोदी सरकारच्या ‘इंडिया फर्स्ट’ धोरणामुळेच हे शक्य झाले, असे सीतारामन म्हणाल्या.

कराच्या महसुलाचा प्रत्येक पैसा भारतातील गरिबांच्या सेवेसाठी वापरला जात असून लसीकरण कार्यक्रम हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. देशातील गरिबांसाठी तब्बल 3.5 कोटी पक्की घरे बांधण्यात आली. देशभरात मोठ्या प्रमाणावर शौचालये बांधली गेली. सरकारी दाव्यांनुसार, ग्रामीण भारतात 100% शौचालय बांधणी झाली. पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असोत किंवा उज्ज्वला योजना असो, या विविध योजनांचा लाभ आतापर्यंत 9.5 कोटी कुटुंबांनी घेतला आहे. 80 कोटी लोकांना पूर्ण दोन वर्षे मोफत अन्नधान्य आणि काही कडधान्ये देण्यात आली. मोदी सरकारच्या नऊ वर्षांना आणखी उल्लेखनीय बनवणारी गोष्ट म्हणजे, कोविड काळातील भारताची भूमिका आणि युक्रेन युद्धातील रोखठोक भूमिका असे सीतारामन म्हणाल्या. तसेच, राम मंदिरांचे बांधकामही पूर्ण करण्यात आले असून वर्षाच्या अखेरीस किंवा 2024च्या सुरुवातीला हे मंदिर खुले होणार असल्याचे त्या म्हणाल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.