Modi Government 11 Years : मोदी सरकार(Modi Government 11 Years)ने मागील ११ वर्षपूर्तीनिमित्त केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी विकासकामांचा लेखाजोखा मांडला आहे. केंद्रातील मोदी सरकार(Modi Government 11 Years)च्या मंत्रिमंडळातील मंत्री जेपी नड्डा यांनी सांगितले की, केंद्र सरकारने सबका साथ सबका विकास या उद्घोषणेचे पालन केले आहे. ते म्हणाले, मोदी सरकारने पुलवामा, पहलगाम या दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासोबतच कलम ३७० रद्द करण्यापर्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले.(Modi Government 11 Years)
(हेही वाचा Mumbra Train Accident : लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू कसा झाला? मध्य रेल्वेने दिली धक्कादायक माहिती )
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार(Modi Government 11 Years)च्या ११ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जेपी नड्डा म्हणाले, केंद्र सरकारने चिनाब पूल प्रकल्प पूर्ण झाल्याचा व सर्जिकल आणि एअर स्ट्राईकसारख्या महत्त्वपूर्ण निर्णयांचाही यात समावेश आहे. मागील ११ वर्षांत मोदी सरकारने अनेक समस्येला तोंड दिले असून प्रत्येक समस्येवर अचूक तोडगा काढल्याचेही नड्डा यांनी सांगितले.
(हेही वाचा Diwa-Kopar दरम्यान धक्कादायक घटना; धावत्या ट्रेनमधून पडून 5 प्रवाशांचा मृत्यू )
भाजपा पक्ष मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जेपी नड्डा बोलत होते. जेपी नड्डा असेही म्हणाले की, डीबीटी व्यवहारांमध्ये सुमारे १३० पट वाढ झाली आहे. आणि JAM त्रिनिटीने ३.९ लाख कोटी रुपयांचा अनावश्यक खर्च वाचविला आहे. १९९५ मध्ये, तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्या काळात चिनाब पुलाची पायाभरणी करण्यात आली होती. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी राष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प म्हणून घोषित केले होते. त्यानंतर आता पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील सरकारच्या कार्यकाळात दि. ०६ जून २०२५ दिवशी लोकार्पण सोहळा पार पडला, असेही ते म्हणाले.
Under the Modi Govt, the number of districts affected by Naxalite violence has significantly reduced from 126 to just 18. Top leaders of Left-Wing Extremism (LWE) have been eliminated.
There was a time when even a former Defence Minister once said, “We don’t build roads in… pic.twitter.com/SF7euzXUTc
— BJP (@BJP4India) June 9, 2025
‘पुलवामा घटनेवर पंतप्रधान म्हणाले होते…’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक समस्येचा सामना केला. जेव्हा उरी येथील दहशतवादी घटना घडली होती त्यावेळी पंतप्रधानांनी म्हटले होते की, याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. आणि त्यानंतर सर्जिकल स्ट्राईक झाला, असे जेपी नड्डा यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, पंतप्रधानांनी त्यावेळेसच सांगितले होते की, तुम्ही खूप मोठी चूक केली असून तुम्हाला त्याचे फळ भोगावे लागेल. बालाकोट एअरस्ट्राईक झाल्यानंतरदेखील दहशतवादी कारवाया थांबल्या नाहीत. आता जेव्हा पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत लष्करी कारवाईद्वारे पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे ०९ अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले.(Modi Government 11 Years)
Join Our WhatsApp Community