भाजपाचे कॅबिनेट मंत्री तथा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) हे नागपूर दौऱ्यावर आहेत. दरम्यान देशभरात ७ जून या दिवशी बकरी ईद (Bakri Eid) साजरी केली जात असतानाच महाराष्ट्र गौसेवा आयोगाने (Maharashtra Gau Seva Commission) पशू बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यावरुन, राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना मंत्री नितेश राणे यांनी राज्यातल्या विविध घडामोडींचा उल्लेख केला. तसेच शिवसेना उबाठाचे आमदार आदित्य ठाकरेंवर सडकून टीका केली. (Nitesh Rane)
(हेही वाचा – आता आयटीआयमध्ये एआय, रोबोटिक्स, ड्रोन टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम; कौशल्य विकासमंत्री Mangal Prabhat Lodha यांची घोषणा) देशभरात ७ जून रोजी बकरी ईद साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र गौसेवा आयोगाने पशू बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. सण तुम्ही साजरे करा, पण सरकारने त्यात हस्तक्षेप करू नये. मीही पर्यावरणप्रेमी आहे, पण कधी पाणी वाचवा, कधी रंग वाचवा, आता हे बचावण्याचे नियम इतके का वाढवायचे? सण साजरे करायला हवेत, पण श्वास घेण्याची मुभा देखील द्यावी, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली होती. त्यावरून नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले.
नेमके काय म्हणाले नीतेश राणे? आदित्य ठाकरे यांनी आपले आडनाव ठाकरे बदलून घेतले पाहिजे, त्यांनी आदित्य खान किंवा आदित्य शेख केले पाहिजे, तेव्हा ते जास्त शोभून दिसेल. बाळासाहेबांचा नातू जर अशा पद्धतीने बोलणार असेल, तर तो ठाकरे आडनाव वापरण्याच्या लायकीचा नाही, अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर केली आहे.
हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्याचा प्रश्न कुठे?
देशात जेव्हा इको फ्रेंडली होळी, इको फ्रेंडली दिवाळी, फटाके मुक्त दिवाळी असे असंख्य सल्ले हिंदू समाजाला दिले जातात, तेव्हा हिंदू समाज समजून घेतो. आम्ही दुसऱ्या धर्माला नावे ठेवत बसत नाही. हिंदू समाज आपला धाक दाखवत नाही. तसाच विचार मुस्लिमांनी करावा, अशी माझी भूमिका व सल्ला असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे. जसे हिंदू समाज पर्यावरणवाद्यांचं ऐकतो आणि फटाके वाजवत नाही, रंग खेळत नाही. तसेच, मुस्लिमांनी इको फ्रेंडली बकरी ईद साजरी करावी हा माझा चांगला सल्ला आहे, त्यामध्ये हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्याचा प्रश्न कुठे? असा सवालही राणेंनी उपस्थित केला.
बडगुजरांच्या भाजप प्रवेशावर काय म्हणाले राणे? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना बडगुजर भेटले असून प्रवेशाचा अधिकृत निर्णय झाल्याची काही माहिती नाही. ते जे काही निर्णय घेतील त्यानंतर प्रतिक्रिया देणे योग्य होईल. मात्र, बडगुजरची शिवसेना उबाठामधून हकालपट्टी झाली आहे, हे मी ऐकले आहे. जेव्हा निर्णय येईल, तेव्हा आपण बोलू, अशी सावध प्रतिक्रिया नितेश राणेंनी दिली आहे.