Maratha Reservation : अखेर जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले; २ जानेवारीपर्यंत दिली मुदत

59
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) गेल्या आठवडाभरापासून उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवार, २ नोव्हेंबर रोजी अखेर आपले उपोषण थांबवले. मराठा समाजाला सरसकट आरक्षणासाठी सरकारला २ जानेवारीपर्यंतची मुदत देत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले.
महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना सरसकट आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी समिती काम करेल, असे ठरले आणि सरकारने ते मान्य केले आहे. आता वेळ घ्या पण आरक्षण द्या. मात्र जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील, साखळी उपोषण सुरूच राहील, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. माजी न्यायमूर्तींनी काढलेली समजूत, समजून सांगितलेले कायदेशीर बारकावे आणि नंतर सरकारच्यावतीने मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने दिलेले आश्वासन यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी सरकारला आणखी काही वेळ देत उपोषण सोडण्याची घोषणा केली. समितीने महाराष्ट्रभर काम करून महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी काम करावे, असे ठरले आणि ते त्यांनी मान्य केले. अर्धवट आरक्षण घेऊन आमचा एक भाऊ नाराज होईल, असे काही करणार नाही. मात्र जर सरकारने दगाफटका केला. तर यांच्या पूर्ण नाड्या बंद करू. चलो मुंबईची घोषणा करून मुंबई बंद करून टाकू. आर्थिक, सामाजिक, औद्योगिक, व्यावसायिक सरकारच्या सगळ्या नाड्या बंद करू, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.