-
प्रतिनिधी
निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापलेले असतानाच मंत्रालयाच्या (Mantralaya) सातव्या मजल्यावर अक्षरशः उकडणारी स्थिती निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या कार्यालयात गेल्या दोन दिवसांपासून सेंट्रल एसी बंद असून कर्मचाऱ्यांचा घामाघूम संघर्ष सुरू आहे. मंत्रालयातील मुख्य इमारतीचा सातवा मजला – म्हणजेच सर्वोच्च मजला – इथं उपमुख्यमंत्र्यांचे कार्यालय आहे. वरच्या मजल्यावर ट्रान्सपरंट फायबर शीट लावलेली असल्याने सूर्यकिरणांमुळे अधिक उष्णता निर्माण होते, आणि या उन्हात वातानुकूलन यंत्रणा बंद असल्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे.
“आरोग्य सहायता” कार्यालयात रुग्णांचीही दमछाक
सर्वसामान्य जनतेसाठी आशेचा किरण ठरलेला मुख्यमंत्री आरोग्य सहायता निधी विभाग देखील याच मजल्यावर आहे. मदतीसाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना एसी बंद असल्यामुळे घामांच्या धारा आणि दमछाक सहन करावी लागत आहे. गरिब, आजारी लोकांना या असुविधेचा फार मोठा फटका बसतोय.
(हेही वाचा – Gaza-Palestine support Protest ला पोलिसांनी परवानगी नाकारूनही आंदोलक उतरले रस्त्यावर; पोलिसांनी आंदोलन हाणून पाडले)
पंखे अपुरे, दुरुस्ती नाही – त्रास कायम
कार्यालयात बसलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपासून एसीशिवाय कामकाज सुरू ठेवलं आहे. मात्र पंखेही गरजेनुसार अपुरे पडत असून, वातानुकूलन यंत्रणेतील बिघाड अजूनही दुरुस्त झालेला नाही. उष्णतेचा त्रास इतका वाढलाय की अनेक कर्मचाऱ्यांना तब्येतीवरही परिणाम जाणवतोय. (Mantralaya)
शासनकर्ते थंडावले, पण कर्मचारी तापलेत
एकीकडे राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना, दुसरीकडे सत्तेच्या गाभ्यातच शासकीय व्यवस्थेचा थंडावलेला चेहरा दिसतोय. “एसी बंद, पण जबाबदाऱ्या सुरुच”, असा टोमणा कर्मचारी वर्गात ऐकायला मिळतोय. शासनाच्या सर्वोच्च मजल्यावरच जर ही परिस्थिती असेल, तर इतरत्र काय स्थिती असेल याची कल्पना न केलेलीच बरी! सत्ताधाऱ्यांनी तत्काळ लक्ष घालून समस्या सोडवावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांतून आणि सर्वसामान्य जनतेतूनही होऊ लागली आहे. (Mantralaya)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community