महत्त्वाच्या पालिकांसाठी महायुतीचा ‘नो रिस्क’ फॉर्म्युला; BJP स्वबळावर लढणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम

68
महत्त्वाच्या पालिकांसाठी महायुतीचा 'नो रिस्क' फॉर्म्युला; BJP स्वबळावर लढणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम
  • प्रतिनिधी 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी जवळ येत असताना, भाजपाकडून (BJP) स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या चर्चा रंगत होत्या. मात्र, महत्त्वाच्या महापालिकांसाठी महायुतीने ‘नो रिस्क’ धोरण स्वीकारल्याचे खात्रीलायक सूत्रांनी उघड केले आहे.

मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, संभाजीनगर आणि नवी मुंबई यांसारख्या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये तिन्ही घटक पक्ष – भाजपा (BJP), शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती महायुतीतील वरिष्ठ नेत्याने खासगीत दिली.

(हेही वाचा – “जर दहशतीचा कणा पुन्हा उभा राहिला तर…” ; PM Modi यांचा पाकला सूचक इशारा)

या धोरणामागे विरोधकांना काहीही संधी न देण्याची रणनीती असल्याचेही समजते. एकत्र लढल्यास ‘सिंबायोटिक’ प्रभाव निर्माण होईल आणि जागा जिंकण्याचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढेल, असा महायुतीचा विश्वास आहे. त्यामुळे ‘स्वबळ’ ऐवजी ‘संबळ’ या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

महायुतीतील अंतर्गत समन्वय अधिक बळकट करून प्रभाग रचना, आरक्षण आणि उमेदवार निवडीच्या प्रक्रियेवरही एकसंध रणनीती आखली जात असल्याचे सांगण्यात येते. विरोधकांकडून ‘आघाडीमध्ये फूट’ असा प्रचार करण्यात येत असतानाच, महायुतीकडून ही राजकीय सुस्पष्टता आणि एकात्मतेची शक्तिप्रदर्शनासारखी घोषणा मानली जात आहे. राज्याच्या राजकीय वर्तुळात आता सर्वांच्या नजरा या ‘नो रिक्स धोरणा’च्या पुढील टप्प्यावर लागल्या आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.