प्रतिनिधी
राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर रखडलेल्या महामंडळ वाटप प्रक्रियेला गती मिळण्याची चिन्हं दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी सोमवारी २६ मे या दिवशी रात्री सह्याद्री अतिथीगृहात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेऊन महामंडळ वाटपासंबंधी जोरदार पाठपुरावा केला. (Mahayuti)
(हेही वाचा – IPL 2025 RCB in Top 2 : दिनेश कार्तिकच्या ‘या’ शब्दांनी जितेश शर्माला मिळाली विजयाची प्रेरणा)
महायुती सरकार स्थापन होऊन पाच महिने उलटले असले तरी अद्याप महामंडळांची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असून, घटक पक्षांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. पवारांच्या या भेटीनंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे.
महामंडळ वाटपावर तिढा कायम – कोण किती वाटा मागतोय?
भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये अद्याप महामंडळ वाटपाचा ठोस फॉर्म्युला ठरलेला नाही.
- भाजपा आपली ताकद सांगत ५०% महामंडळांवर दावा करत आहे.
- शिवसेना सुमारे ३०% वाटा मागते आहे.
- तर राष्ट्रवादी काँग्रेस २५-३०% पदांवर आपला हक्क सांगत आहे.
मात्र यामध्ये शिवसेनेला राष्ट्रवादीचा वाटा अतिरेक वाटतो आहे. “आमच्याकडे अधिक खासदार व आमदार आहेत, त्यामुळे आमचा वाटा जास्त हवा,” असा शिवसेनेचा आग्रह आहे. यामुळे वाटपाचा तिढा अधिक गुंतागुंतीचा झाला आहे.
(हेही वाचा – मुंबईतील खाजगी जागांमधील झाडांचीही छाटणी BMC करणार मोफत )
निवडणुका डोळ्यांसमोर – पवारांचा थेट इशारा
सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवारांनी शाह यांच्यासमोर ठामपणे सांगितले की,”स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ आहेत. त्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांना उत्साह देण्यासाठी महामंडळ वाटप लवकर करणे गरजेचे आहे.” यासोबतच, त्यांनी शाह यांच्याकडे थेट मध्यस्थी करण्याची मागणी केल्याचेही समजते.
वाटप अंतिम टप्प्यात? पुढील आठवड्यात मोठा निर्णय शक्य
शाह-पवार भेटीनंतर, तीनही पक्षांमध्ये अंतिम चर्चा सुरू असून वाटपाचा निर्णय येत्या आठवडाभरात जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांत आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. “कोणाला किती महामंडळं?” हा सध्या सर्वांचाच कळीचा प्रश्न झाला आहे.
(हेही वाचा – Hybrid Terrorists : लष्कर-ए-तोयबाच्या दोन हायब्रिड दहशतवाद्यांचे आत्मसमर्पण !)
सत्तासंहितेचा नवा अध्याय सुरू होणार?
राज्याच्या राजकारणात महामंडळ वाटप ही केवळ पदवाटपाची बाब नसून, सत्तेच्या प्रतिष्ठेची लढाई ठरत आहे.
- भाजपा दबदबा टिकवण्याचा प्रयत्न करत आहे,
- शिवसेना स्थानिक बालेकिल्ले वाचवण्याच्या धडपडीत आहे.
- तर राष्ट्रवादी सत्तेत ठोस हिस्सा मिळवण्यासाठी आक्रमक आहे.
या पार्श्वभूमीवर, महायुतीतील सत्तासंघर्ष निर्णायक वळणावर आला असून, लवकरच राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महामंडळ वाटपाच्या निर्णयाकडे राज्याचे संपूर्ण राजकारण आणि कार्यकर्ते डोळे लावून बसले आहेत. पुढील आठवडा, सत्तासंहितेतील नवा अध्याय लिहिणारा ठरू शकतो.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community