देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुन्हा नंबर १ बनेल; नांदेडच्या सभेत केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांनी केले मुख्यमंत्र्यांचे कौतुक

138
“ऑपरेशन सिंदूरमुळे माता भगिनींची मान गर्वाने उंचावली”; केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांचा पुनरुच्चार
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारपासून तीन दिवसांसाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी नागपूर येथे विविध पायाभरणी आणि नवीन प्रकल्पांचे उद्घाटन केले. दरम्यान दुसऱ्या दिवशी नांदेड येथे आयोजित विशाल जाहीर सभेत उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामांवर विश्वास व्यक्त केला असून, शिवसेना उबाठाचे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे. (Amit Shah)

(हेही वाचा – Jyoti Malhotra च्या अडचणीत वाढ; पाकमध्ये AK 47 बंदूक घेतलेल्या सुरक्षारक्षकांसोबत फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल)   
      

जनतेला संबोधित करताना अमित शाह म्हणाले की, नांदेड गुरु गोविंद सिंग यांची भूमी आहे, इथून पाकिस्तानपर्यंत आवाज पोहोचेल असा प्रचंड आवाज आला पाहिजे असे म्हणत ‘भारत माता की जय’च्या घोषणा देण्यात आल्या. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुन्हा एकदा नंबर १ बनेल, असा विश्वास देखील अमित शाह यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
अमित शहा म्हणाले, देवेंद्र फडणवीस एकमेव असे आहेत, जे पाच वर्ष काम करून पुन्हा निवडून आले आहेत. तसेच यावेळी भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उल्लेख करताना अमित शाह म्हणाले, मंचावर उपस्थित भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष व भावी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण. त्यामुळे भाजपाचे भावी अध्यक्ष रवींद्र चव्हाण असणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे.
मी नांदेडच्या भूमीवर आलो आहे, सर्व प्रथम रेणुका देवी यांना प्रणाम करत मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो, असे म्हणत अमित शाह यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंग यांनी आपले देह त्याग करण्यासाठी या भूमीची निवड केली होती, असेही ते यावेळी म्हणाले. याच भूमीचे वरिष्ठ नेता शंकरराव चव्हाण यांचे देखील त्यांनी स्मरण केले.

(हेही वाचा – Mumbai Rain Update : जोरदार पावसाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा; यंत्रणांसह, प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश)

ऑपरेशन सिंदूर करत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त
मला फार काही बोलायचे नाही. परंतु काही दिवसांपूर्वी २२ तारखेला पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद्यांचा खात्मा केला होता. १० वर्षांपूर्वी येथे कॉंग्रेसची सत्ता होता. पण जेव्हापासून मोदी सरकार आले तेव्हा आपण उरीमध्ये स्ट्राइक केली आणि आता ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) करत त्यांच्या दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूरने संपूर्ण जगाला एक संदेश दिला आहे की भारताचे सैन्य, जनता आणि सीमेशी छेडछाड करू नये. नाहीतर परिणामांना सामोरे जावे लागेल.
३१ मार्च २०२६ या देशातून नक्षलवाद संपवला जाईल
आता आपल्याला असा भारत बनवायचा आहे की, विकासासोबत शक्तिशाली देश असेल. जेव्हा ऑपरेशन सिंदूर तिकडे सुरू होते तेव्हा अजून एक ऑपरेशन सुरू होते. ब्लॅक फॉरेस्ट नावाचे ऑपरेशन (Operation Black Forest)  सुरू होते. छत्तीसगडमध्ये ५००० फूट उंच डोंगरावर नक्षलवादी अड्डे उध्वस्त करण्यात आले. ३१ नक्षली मारले गेले व त्यानंतर आणखी मारले गेले. आता मी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर येऊन सांगून जातो की ३१ मार्च २०२६ या देशातून नक्षलवाद संपुष्टात आणला जाईल.

(हेही वाचा –  Veer Savarkar : ‘वीर सावरकरांचा सैनिकीकरणाबाबतचा सल्ला आज खरा ठरत आहे’; पुरस्कार सोहळ्यात ब्रिगेडियर (नि.) हेमंत महाजन म्हणाले…)

उद्धव ठाकरेंवर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधू जल करार रद्द केला. मोदी यांनी स्पष्ट केले की रक्त आणि पाणी एकसाथ नाही वाहणार. तसेच पाकिस्तानसोबतचे सगळे व्यापारी मार्ग बंद केले. ‘ट्रेड आणि टेरर’ एकसाथ नाही चालणार. आणि पुन्हा जर पाकिस्तानने काही केले तर त्यांच्या तीन पिढ्या लक्षात ठेवतील. ऑपरेशन सिंदूरच्या नंतर जेव्हा मोदींनी निर्णय घेतला की हा देशाचा मुद्दा आहे तेव्हा देशाचे खासदार मिळून जगाच्या वेगवेगळ्या देशात जाऊन पाकिस्तानचा आतंकवादी चेहरा उघडकीस आणत आहेत. यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, ही कोणाची वरात चालली आहे. या उद्धव सेनेला काय झाले आहे? एकेकाळी हा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा होता. आज बाळासाहेब असते तर ऑपरेशन सिंदूरसाठी मोदीजींची गळाभेट घेतली असती. परंतु, हे उद्धव सेना यात यांचे देखील खासदार विविध देशात सर्व दलांच्या बैठकीसाठी गेली आहे, तरी देखील यावर नाव ठेवण्याचे काम करत आहे. अशी टीका केंद्रीयमंत्री अमित शाह यांनी केली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.