Maharashtra Politics : अमरावतीत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! माजी आमदार ज्ञानेश्वर धाने-पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

130
Maharashtra Politics : अमरावतीत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! माजी आमदार ज्ञानेश्वर धाने-पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश
  • प्रतिनिधी

शिवसेना उबाठाला अमरावती जिल्ह्यात मोठा राजकीय धक्का बसला आहे. बडनेराचे माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. धाने पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनीही शिवसेना उबाठाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केल्याने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची अमरावतीतील ताकद कमकुवत झाल्याची चर्चा आहे. (Maharashtra Politics)

धाने पाटील यांचा प्रवेश : शिवसेना उबाठाला हादरा

अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिलेले ज्ञानेश्वर धाने पाटील यांनी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत उपमहानगरप्रमुख आणि नगरसेवक सुनील राऊत, युवा सेना जिल्हाप्रमुख श्याम धाने पाटील, उपजिल्हाप्रमुख पवन दळवी, तालुका प्रमुख राहुल लांजेवर, निलेश तिवारी, संतोष मनोहर, निलेश पारवे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. या सामूहिक पक्षांतरामुळे शिवसेना उबाठाची अमरावतीतील पकड ढिली पडण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics)

(हेही वाचा – Austria School Firing : ऑस्ट्रेलिया येथील एका शाळेत अंदाधुंद गोळीबार, ११ विद्यार्थ्यांचा मृत्यू; नेमकं प्रकरण काय ?)

उपमुख्यमंत्री शिंदेंचा मास्टरस्ट्रोक

महायुती सरकार सत्तेत आल्यापासून शिवसेना उबाठातील नेते आणि कार्यकर्त्यांची गळती थांबण्याचे नाव घेत नाही. यापूर्वी सांगलीत चंद्रहार पाटील यांनी शिवसेना उबाठाला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता अमरावतीत ज्ञानेश्वर धाने पाटील यांच्या प्रवेशाने उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना उबाठाचे पश्चिम महाराष्ट्रातील वर्चस्व आणखी कमकुवत केले आहे. यापूर्वीच संजय बंड आणि प्रिया बंड यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने अमरावतीत शिवसेना उबाठाची ताकद आधीच कमी झाली होती. (Maharashtra Politics)

उपमुख्यमंत्री शिंदेंचे वक्तव्य : जनतेचा विश्वास महायुतीवर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रवेशानंतर सांगितले, “मागील अडीच वर्षांत महायुती सरकारने केलेल्या कामांमुळे जनतेने आम्हाला ऐतिहासिक बहुमत दिले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लोक आमच्या कामावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करत आहेत. धाने पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत आहे. आम्ही सर्व मिळून अमरावती आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करू.”

ज्ञानेश्वर धाने पाटील यांचा बडनेरा आणि अमरावती जिल्ह्यातील प्रभाव लक्षात घेता, त्यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेला बळ मिळेल. शिवसेना उबाठाला मात्र आपली ताकद टिकवण्यासाठी नव्याने रणनीती आखावी लागणार आहे. सांगली आणि अमरावतीसारख्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये शिवसेनेने आघाडी घेतल्याने शिवसेना उबाठासमोरील आव्हाने वाढली आहेत. (Maharashtra Politics)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.