Maharashtra Political Crisis : माझ्या शिवसेनेचा आदेश अंतिम असेल – उद्धव ठाकरे

राज्यपालांवरही कारवाई व्हावी ही माझी मागणी आहे. निवडणूक आयोग म्हणजे ब्रह्मदेव नाही.

185
Maharashtra Political Crises : माझ्या शिवसेनेचा आदेश अंतिम असेल - उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून राज्यात ठाकरे विरुद्ध शिंदे असा (Maharashtra Political crisis) सत्तासंघर्ष सुरु झाला. या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवार ११ मे २०२३ रोजी आपला निर्णय दिला. त्या निर्णयावर माझी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी आपले मत मांडले.

(हेही वाचा – Maharashtra Political Crises : विधानसभा अध्यक्षांनी भरत गोगावलेंची व्हीप म्हणून केलेली नियुक्ती बेकायदेशीर – सर्वोच्च न्यायालय)

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

देशप्रेमी पक्ष आणि जनतेला एकत्र करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आजचा सर्वोच्च न्यायालयाचा (Maharashtra Political crisis) निर्णय समाधकारक आहे. न्यायालयाचा निर्णय हा केवळ शिवसेनेच्या (uddhav thackeray) भवितव्यासाठी नव्हता, तर यापुढे देशात लोकशाही जिवंत असणार का, यासाठी महत्त्वाचा ठरणार होता. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा निर्णय शिवसेनेचा नसून लोकशाहीचा आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालात सत्तेसाठी हपापलेल्या आणि उघडंनागडं राजकारण केलेल्या माणसांची चिरफाड केली आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्यपालांच्या भूमिकेचेही न्यायालयाकडून वस्त्रहरण झाले आहे. राज्यपाल ही यंत्रणा आत्तापर्यंत आदरयुक्त यंत्रणा होती, मात्र त्याचे धिंडवडे ज्या पद्धतीने शासनकर्ते काढत आहेत, ते पाहिल्यावर राज्यपाल यंत्रणा अस्तित्वात ठेवावी की नाही, हा मोठा विचार सर्वोच्च न्यायालयापुढे मांडायला हवा. तूर्त, सर्वोच्च न्यायालयाने (Maharashtra Political crisis) दिलेल्या निकालात राज्यपालांना अधिवेशन बोलवण्याचा अधिकार नव्हता वगैरे म्हटलेय. पण अपात्रतेचा निर्णय त्यांनी अध्यक्षांवर सोपवला असला, तरी माझ्या शिवसेनेचा आदेश अंतिम असेल हेही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. मी राजीनामा दिला नसता तर पुन्हा मुख्यमंत्री झालो असतो. तसेच माझी लढाई ही जनतेसाठी आहे. सध्या देशात लोकशाहीची हत्या होतांना दिसत आहे.(Maharashtra Political crisis)

तसेच मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांनी नैतिकता दाखवून राजीनामा द्यावा आणि निवडणुकांना सामोरे जावे; तसेच राज्यपालांवरही कारवाई व्हावी ही माझी मागणी आहे. निवडणूक आयोग म्हणजे ब्रह्मदेव नाही. (Maharashtra Political crisis)

हेही पहा – 

अशा भाषेत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आपली भूमिका स्पष्ट केली. (Maharashtra Political crisis)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.