महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या प्रकरणावर मंगळवार, १४ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे हा दिवस व्हॅलेंटाईन डे आहे, प्रेमाचे प्रतीक असलेल्या या दिवशी मात्र ठाकरे आणि शिंदे गटाच्या ब्रेकअपवर सुनावणी होणार आहे.
…तर अंतिम निर्णय होईल
१० जानेवारी २०२३ रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने १४ फेब्रुवारी ही तारीख दिली होती. जर हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे पाठविण्याचे मंजूर झाले तर मग निकाल येण्यासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागेल. त्यामुळे १४ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालय काय निर्देश देणार याकडे दोन्ही गटाचे आणि महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. जर हे प्रकरण सात न्यायमूर्तींकडे पाठवले नाही, तर घटनापीठ या प्रकरणात अंतिम निर्णय देईल. १४ ते २१ फेब्रुवारी दरम्यान या प्रकरणावर निकाल येणे अपेक्षित असणार आहे, असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.
(हेही वाचा सावरकरांच्या विचारातूनच भाजप हिंदू-मुसलमानांमध्ये द्वेष पसरवतो; सिद्धरामय्यांनी ओकली गरळ)
Join Our WhatsApp Community