नानांच्या आरोपांत पाणी मुरतंय, काँग्रेसच्या मंत्र्यांनीच केले स्पष्ट

97

राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या पाठीत खंजीर खपसत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्यानंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील वाद पुन्हा एकदा समोर आले आहेत. त्यांच्या या आरोपात तथ्य असल्याचे आता काँग्रेसचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

नक्कीच त्यात सत्यता आहे

नाना पटोले यांनी उपस्थित केलेला मुद्दा हा पक्षाच्या बाबींवर प्रकाश टाकणारा आहे. पटोले हे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे जर त्यांनी हा आरोप केला असेल तर त्यात कुठेतरी सत्यता आहे. कुठेतरी पाणी नक्कीच मुरत असल्याशिवाय ते असा आरोप करणार नाहीत. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तपास करणे गरजेचे आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी सामंजस्याने काम केले तरच सरकारला यश मिळेल, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः तिघे एकत्र असलो तरच बहुमताचा आकडा पार करता येतो, अजित पवारांचे विधान)

अजित पवारांचा टोला

राष्ट्रवादीने आपले काही नगरसेवक फोडल्याचे पटोले यांनी म्हटले होते. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की काँग्रेसनेही राष्ट्रवादीच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आपल्याकडे घेतले आहे. नाना पटोले हे स्वतः आधी काँग्रसेध्ये होते, तिथून ते भाजपमध्ये गेले आणि पुन्हा काँग्रेसमध्ये आले. त्यामुळे प्रत्येकाने आपली झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवावी, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.