
Maharashtra BJP : आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Elections) आहेत. या निवडणुकांच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीने (BJP) पक्षांतर्गत पायाभरणीस प्रारंभ केला आहे. तसेच भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश संघटनेत एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. राज्यभरात एकूण १२२१ मंडळ स्थापन करण्यात आले आहेत. त्यापैकी ९६३ मंडळ अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती भाजपाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी दिली. (Maharashtra BJP)
(हेही वाचा – Kulbhushan Jadhav पाकिस्तानातील उच्च न्यायालयात करू शकणार नाहीत अपील)
तसेच ही प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध आणि प्रभावी पद्धतीनं पूर्ण झाली आहे. “संघटन हेच खरे बळ” या तत्त्वावर चालत, भाजपाने आता महाराष्ट्रात (Maharashtra) मजबूत गड उभारण्याची तयारी सुरू केली आहे. असे विधान रवींद्र चव्हाण यांनी केले. भाजपाच्या संघटनात्मक बांधणीचा हा टप्पा महाराष्ट्राच्या सर्व भागांतील राजकीय ताकद दृढ करण्याच्या दृष्टीनं निर्णायक ठरतोय. संपूर्ण राज्यभर १२२१ मंडळ गठीत करण्यात आले आहेत, त्यापैकी ९६३ मंडळांची रचना जाहीर करण्यात आली असून, यातील २५८ मंडळे नव्यानं स्थापन केली गेली आहेत.
(हेही वाचा – Murshidabad Violence : झियाउल शेखला अटक; हिंदू पिता-पुत्राची हत्या करण्यासाठी मुसलमानांना चिथवले होते)
प्रमुख विभाग
- कोकण-ठाणे विभागात १८४ मंडळ
- उत्तर महाराष्ट्रात १८४ मंडळ
- पश्चिम महाराष्ट्रात २२२ मंडळ
- विदर्भात ३१३ मंडळ
- मराठवाड्यात २०७ मंडळ
- मुंबई विभागात १११ मंडळ
मंडळ गठीत करण्यात आले आहेत. या संपूर्ण नियुक्त्या केवळ आकडेवारी नाही, तर पक्षाची जनाधारावर आधारित शक्ती वाढवण्याचा प्रयत्न आहे. यातून भाजपाच्या कार्यपद्धतीतील शिस्त, संघटन आणि वेळेचं भान प्रकर्षानं अधोरेखित होते. भाजपाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी (Election) एका संघटित आणि समर्पित कार्यपद्धतीची ही सुरुवात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community