LK Advani Bharat Ratna : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत दिली माहिती. "लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाईल, हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे." असे पंतप्रधान मोदींनी ट्विट केले आहे.

408
LK Advani Bharat Ratna : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर

मोदी सरकारने शनिवार ३ फेब्रुवारी रोजी एक मोठी घोषणा केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (LK Advani Bharat Ratna) यांना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. स्वतः पंतप्रधान मोदी यांनीच ही माहिती दिली आहे.

(हेही वाचा – Rani Baug Flower Show : दहा हजार कुंड्यांमधील विविधरंगी फुलांनी वेधले मुंबईकरांचे लक्ष)

काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?

लालकृष्ण अडवाणी (LK Advani Bharat Ratna) यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाईल, हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे. मी त्यांच्याशीही बोललो आणि हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. आपल्या काळातील सर्वात आदरणीय राजकारण्यांपैकी एक, भारताच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. मोदींनी X वर असे लिहले आहे.

अडवाणी यांनी तळागाळातील काम केले – पंतप्रधान मोदी 

तळागाळापर्यंत काम करण्यापासून ते उपपंतप्रधान म्हणून देशाची सेवा करण्यापर्यंत लालकृष्ण अडवाणी (LK Advani Bharat Ratna) यांचे जीवन आहे. आमचे गृहमंत्री आणि माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणूनही त्यांनी स्वतःला प्रतिष्ठित केले. मोदी म्हणाले की, त्यांचे संसदीय कार्य नेहमीच अनुकरणीय आणि समृद्ध अंतर्दृष्टींनी परिपूर्ण राहिले आहे.

(हेही वाचा – ABVP Pune University : नाटकात रामायणातील पात्र आक्षेपार्ह दाखवल्याचा ‘अभविप’ चा आरोप, नाटक पाडले बंद)

हा माझ्यासाठी भावनिक क्षण – पंतप्रधान मोदी

“अडवाणी (LK Advani Bharat Ratna) यांची जनसेवेतील पारदर्शकता सदैव स्मरणात राहील. ते म्हणाले की, अडवाणी यांनी राजकीय नैतिकतेत एक अनुकरणीय मापदंड स्थापित केला आहे. राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनाला चालना देण्यासाठी त्यांनी अतुलनीय प्रयत्न केले आहेत.

“भारतरत्न पुरस्काराने (LK Advani Bharat Ratna) सन्मानित होणे हा माझ्यासाठी अतिशय भावनिक क्षण आहे. त्यांच्याशी संवाद साधण्याची आणि त्यांच्याकडून शिकण्याची संधी मिळाली हे मी नेहमीच माझे भाग्य मानतो. ” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.